Letest News
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप... राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप) सुनील निवृत्ती पाटील शिंदे यांचा प्रचंड दावा : “प्रभाग २ मध्ये नंदूभाऊंचा विजय ठरलेलाच… विरोधकांची ब... एआय बनावट वन्यप्राणी व्हिडिओवाल्यांना थेट जेल — एसपी सोमनाथ घार्गे यांची कडक सूचना”
क्राईमशिर्डी

साईबाबांवर आक्षेपार्ह विधाने करणारे अजय गौतम न्यायालयात हजर — चूक मान्य करत साईबाबांचे दर्शन

राहाता (प्रतिनिधी) –
श्री साईबाबा आणि श्री साईबाबा संस्थानविषयी समाजमाध्यमांतून आक्षेपार्ह विधाने करणारे अजय गौतम यांनी आज राहाता न्यायालयात हजर राहून आपली चूक मान्य केली आहे. त्यांनी न्यायालयासमोर नमूद केले की, “श्री साईबाबा व श्री साईबाबा संस्थानबाबत असलेले माझे गैरसमज आता पूर्णपणे दूर झाले असून, यापुढे मी कोणतेही चुकीचे वक्तव्य, मुलाखत किंवा भाष्य करणार नाही.”

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🔹 संस्थानकडून दाखल कायदेशीर दावा

सन 2023 मध्ये साईबाबांविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या पार्श्वभूमीवर, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेने राहाता न्यायालयात अशा वक्तव्य करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर दावा दाखल केला होता. त्यामध्ये अजय गौतम यांचा समावेश होता.
सदर प्रक्रियेत दीर्घकालीन समन्वयानंतर आणि प्रत्यक्ष संवादातून त्यांचे गैरसमज दूर झाले असल्याने त्यांनी आज न्यायालयात लेखी स्वरूपात आपली चूक मान्य केली.


🔹 साईबाबांचे दर्शन घेऊन व्यक्त केला खेद

न्यायालयीन निवेदनानंतर अजय गौतम यांनी श्री साईबाबांच्या मध्यान्ह आरतीसाठी उपस्थित राहून दर्शन घेतले. दर्शनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भावनिक प्रतिक्रिया देत सांगितले की, “माझ्याकडून पूर्वी जे वक्तव्य झाले ते अपुऱ्या माहितीतून झाले. आता मी साईबाबांच्या प्रचार–प्रसारासाठी लवकरच एक पुस्तक लिहिणार आहे.”


🔹 संस्थानचा सकारात्मक प्रतिसाद — गैरसमज दूर करण्याचे आवाहन

या सकारात्मक बदलाचे स्वागत करत श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी सांगितले की, “ज्यांच्या मनात अजूनही साईबाबांविषयी काही गैरसमज असतील त्यांनी थेट संस्थानशी संपर्क साधावा. परंतु जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्यांविरुद्ध

कायदेशीर कारवाई सुरूच राहील.”
या संपूर्ण प्रक्रियेत श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त श्री मोहन जयकर यांनी महत्त्वपूर्ण समन्वय साधला असल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले.


🙏 साईभक्तांमध्ये समाधान — सद्भावनेचा विजय

या घटनेनंतर साईभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण असून, “सत्य, श्रद्धा आणि सबुरीच्या मार्गावर पुन्हा एक मन वळले” असा भावनिक सूर भक्तांमध्ये उमटला आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button