
शिर्डी( प्रतिनिधी) संपूर्ण विश्वाला सर्वधर्मसमभाव व श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी येथे दिवसेंदिवस कायदा व सुव्यवस्था बिघडत चालल्याचे दिसून येत असून जिल्हा पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेत आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.
शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे. येथे दररोज हजारोंच्या संख्येने व उत्सव काळात लाखोच्या संख्येने साईभक्त दर्शनासाठी देश-विदेशातून येत असतात. मोठी आर्थिक उलाढाल येथे होत असते . येथे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या आशिर्वादानी राजरोसपणे सुरु आहेत .येथे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली असून राज्यातून, इतर राज्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येथे येऊन राहतात .
हार फुल व विविध प्रकारे एजंटचा सुळसुळाट वाढला आहे . साईभक्तांना फसवून पैसे कमवतात व दारू गांजा चरस अफू अशा नशा करतात. आणि मग आपापसात किंवा साईभक्तांना हाणामारी करणे शिवीगाळ करणे एवढेच नव्हे तर येथे दादागिरी गुंडगिरी वाढली आहे. शिर्डीत साई संस्थांनच्या कर्मचाऱ्यांचा खून करण्यात आला .
हे दुहेरी हत्याकांड संपूर्ण राज्यात गाजले .त्यानंतर शिर्डीच्या काकडी विमानतळा जवळ दोन जणांचा खून करण्यात आला. एवढेच नव्हे तर शिर्डीत गावठी कट्टे तसेच अवैध शस्त्र सापडत आहेत. अवैध वाहतूक, अवैध दारू मटका जुगार सुरू आहे .ह्या पवित्र नगरीत गोमांस राजरोसपणे विकले जाते त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावत आहे.
कायदा सुव्यवस्था बिघडत आहे. शिर्डीत एका शेअर्स ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली चार जण एकत्र येऊन त्यांनी मोठमोठी व्याजाची आमिषे दाखवून कोट्यावधी रुपये माया जमवली आहे. चार ते पाच वर्षापासून येथे ही कंपनी सुरू आहे. पूर्वी गुंतवणूकदारांना चांगला व्याजासह परतावा मिळत होता. मात्र आता पैशे देण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे शेवगाव, कोल्हापूर सारखा गुंतवणूकदारांना शेअर्स ट्रेडिंग च्या नावाखाली फसवण्याचा तर हा प्रकार नाहीना?
अशी शंका आता गुंतवणूकदारांना येत असून अनेक गुंतवणूकदार खाजगीत तशी चर्चा करत आहे. त्यामुळे शिर्डीत मोठी खळबळ उडालेली आहे. असे असतानाही शासकीय यंत्रणा ,जिल्हा पोलीस प्रशासन गप्प आहे. गुंतवणूकदारांनी जादा परतावा मिळतो म्हणून या शेअर्स ट्रेडिंग कंपनीमध्ये पैसा गुंतवला आहे .मात्र आता परतावा मिळत नसल्यामुळे मोठी अडचण गुंतवणूकदारांची झाली असून उघडपणे जाहीर बोलता येत नाही .
अशी परिस्थिती गुंतवणूकदारांची झाली आहे. अशी दबक्या आवाजात मोठी चर्चा आहे. आवाज उठवला तर पैसे परताव्यासह परत मिळतील की नाही ही शंका आहे. त्यामुळेच कोणी तक्रार करत नाही. मात्र शासकीय किंवा पोलीस प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून नेमकी शिर्डीतील हा शेअर्स ट्रेडिंग कंपनीच्या कोणाच्या नावाखाली चालले आहे हा प्रकार अधिकृत आहे की अनधिकृत आहे. गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये हे कुठे या कंपनीच्या मालकाने गुंतवणूक केलेले आहेत.
इन्कम टॅक्स भरता की नाही , बँकच्या अपेक्षापेक्षा ज्यादा परतावा कसा दिला जातो.याची सर्व चौकशी होऊन सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत अशी सर्व गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे. मात्र त्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन यांनी विशेष लक्ष घातले पाहिजे परंतु शहर पोलिसांपासून जिल्हा पोलीस प्रमुखांनी यावर चुप्पी साधली आहे . एवढी चर्चा होऊ होवूनही आतापर्यंत जिल्हा पोलीस प्रशासन गप्प आहे. नेमकी त्या पाठीमागे काय कारण आहे. हे तरी स्पष्ट होणे गरजेचे आहे .
सर्व सामान्य गुंतवणूकदार यांना आता शासकीय यंत्रणांनी हस्तक्षेप करून आमचे गुंतवलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा.अशी आशा आहे व तसा शासकीय आर्थिक संबंधात असलेल्या विविध संस्थांनी या संदर्भात या शेअर्स ट्रेडिंग कंपनीची चौकशी करावी व चौकशीत कोणी दोषी आढळल्यानंतर या ट्रेडिंग कं.वर कडक कारवाई करावी. अशी गुंतवणूकदारांमध्ये आपापसात चर्चा होत आहे.