शिर्डी ( प्रतिनिधी)
शिर्डी मध्ये दुहेरी हत्याकांड झाल्यानंतर कडक पोलीस बंदोबस्त व अवैध धंद्यांवर धाडी सत्र सुरू करण्यात आले होते. त्यामुळे गुन्हेगारी वृत्तीचे तसेच अवैध धंदे करणारे शिर्डीत दिसून येत नव्हते.
मात्र नव्याचे नऊ दिवस संपले आणि परत शिर्डीत जैसे थे परिस्थिती होऊ लागली आहे. शिर्डीत परत अवैध धंदे तेजीत सुरू झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच गुन्हेगारी वाढली आहे. दिवसाढवळ्या तरुण मुलींना टवाळखोर युवक छेडछाड करत आहेत.
शिर्डी हे धार्मिक तीर्थस्थान आहे. येथे देश विदेशातून साईभक्त येत असतात. मात्र अनेकदा या साईभक्तांना पॉलिशवाले एजंट व काही टवाळखोरांकरांकडून आर्थिक लुटमार केली जाते. येथे पाकीटमारी , धूम स्टाईल चोऱ्या, त्याचप्रमाणे अवैध दारू गांजा विक्री, मटका जुगार क्लब, सर्रास सुरू आहेत. काही दिवस हे बंद होते .
परंतु आता परत हळूहळू हे अवैध धंदे सुरू झाले आहेत. अवैध प्रवासी वाहतुक परत दिसून येत आहे.काही रिक्षा चालकांची मनमानी वाढली आहे. साईभक्तांच्या वाहनाला एका रिक्षा चालकाने स्वतःहून कट मारला व उलट साई भक्ताच्या वाहनचालकालाच शिवीगाळ करण्याचा प्रकार नुकताच येथे पिंपळवाडी रोडला घडला आहे.
शिर्डीत पानमळा येथे एका तरुणाने एका तरुण मुलीच्या गळ्यात हात घालून ओढत नेण्याचा प्रकार घडला आहे. असे प्रकार येथे सर्रास घडत आहेत. शिर्डीसह सावळीविहीर निमगाव येथे राजरोसपणे पत्त्यांचे क्लब जुगार मटका चालू असल्याची यादीच प्रसिद्द झाली आहे तरीही शिर्डी पोलीस यांच्याकडे लक्ष डे नसल्याने काही चिरीमिरी घेऊन हे सर्व अवैद्य व्यवसाय सुरु आहेत कि काय असे नागरीकांमधी बोलले जात आहे
यावर नियंत्रण कधी येणार. येथे पोलीस प्रशासनाचे लक्ष आहे की नाही असा सवाल आता साईभक्त, ग्रामस्थ करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. व साई भक्तही आहेत. त्यांनीच शिर्डीतील या गुन्हेगारी प्रवृत्ती, व विशेष लक्ष घालून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्या संदर्भात आदेश द्यावेत व शिर्डीत एक धार्मिक वातावर,ण स्वच्छ वातावरण व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याचा प्रयत्न होईल. असा प्रयत्न करावा अशी मागणी साईभक्त, ग्रामस्थांनी केली आहे.