
अ.नगर – अहिल्या नगर शहरातील मनपा हद्दीत असणारे 41 ओढे नाले नष्ट झाल्यामुळे शहरांमध्ये भर पावसाळ्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन याचे नियोजनाचा अभाव असल्याने व मनपाने नेमून दिलेल्या ठेकेदार व त्याची यंत्रणा अयशस्वी ठरल्याने गेली दहा ते पंधरा वर्षापासून संपूर्ण मॅनेजमेंट होऊन अंतर्गत नालेसफाई व तसेच सीना नदी व अंतर्गत येणारे ओढे- नाले यांची सफाई ठेकेदार एजन्सीला दिले जाते,

परंतु यावर कोणताच वचक नसून सीएसआय व एसआय हे फक्त कागदोपत्री ठेकेदारांना काम केल्याचे सर्टिफिकेट देतात, परंतु रस्त्यावर काम होताना दिसत नाही. तसेच सीना नदीचा गाळ जेसीपीने तिथल्या तिथच सरकावला जातो. व पुर आल्यानंतर तो गाळ पुन्हा तेथेच येऊन पडातो.
तसेच शहरातील 32 हॉस्पिटल यांची चौकशी वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची सक्तीच्या रजेवर गेल्यानंतर झालेली चौकशी होती. पुढे या 32 हॉस्पिटलच्या काय कारवाई केली याची मनपाने कुठलीही माहिती दिलेली नाही. हे अचानक हे हॉस्पिटल पावन कसे करून घेतले. हा नागरिकांना पडलेला प्रश्न आहे.
तसेच उपनगरातून व शहरातील मध्यवस्तीत येणारे दिल्ली गेट कापड बाजार, नवी पेठ व जुना बाजार या ठिकाणी वाहने लावण्यास व्यापारी दुकानदार मज्जाव करतात. यासाठी व तसेच प्रत्येक दुकानापुढे लागणार्या चार चाकी व्यावसायिक गाड्या यामुळे नागरिकांना शहरात पायी चालण्यासाठी साधी वाटही मिळत नाही.
मोठमोठ्या सणांना महिला व जेष्ठ नागरिक तसेच लहान मुले यांना फार मोठ्या त्रासातून जावे लागते. तरी या आमरण उपोषणात वरील दोन मुद्द्यांपैकी या ठिकाणी रास्ता रुंदी करण्यात यावी, असे शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार अशी माहिती पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती संतोष नवसुपे यांनी दिली.
यावेळी शहराध्यक्ष अक्षय कांबळे ,संघटन मंत्री संतोष त्रिंबके, जिल्हाध्यक्ष सतीश खैरे, उत्तर जिल्हाध्यक्ष करण गारदे भिंगार शहराध्यक्ष राकेश सारवान कुणाल बैद नवनाथ मोरे महिला आघाडी उमा छजलाने सुनिता चव्हाण तसेच व्यापारी आघाडी प्रमुख विजय पितळे, जय बोरा ,जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जगधने,
माजी नगरसेवक अनिल शेकटकर, ओबीसी आघाडी बाबासाहेब करपे , यशवंत पानसरे, प्रितम परदेशी,निलेश पालवे ,देवदत्त पुजारी ,मंगल बरगडे ,पुनम शिंदे, वैशाली सावंत आदि पदाधिकारी उपस्थित होते.