Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
अ.नगरराजकीय

ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपर वरच निवडणुका घ्या! सिमोन ठकाजी जगताप

शिर्डी ( प्रतिनिधी) सध्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका पार पाडल्या .त्या ईव्हीएम मशीन द्वारे निवडणुका घेण्यात आल्या. मात्र अनेक ठिकाणी मशीन बाबत साक्षमता निर्माण झाली असून तशी चर्चा राज्यात सुरू आहे. अनेकांनी येथून पुढील सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर (मतपत्रिकेवर) घेण्याचे मागणी केली आहे.
अशी मागणी यापूर्वीच 30 डिसेंबर 2024 रोजी राहता तालुक्यातील निमगाव कोराळे येथे झालेल्या ग्रामसभेत ठरावाद्वारे करण्यात आली होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


‌ राहता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे ग्रामपंचायत असून येथे 30 डिसेंबर 2024 रोजी ग्रामसभा संपन्न झाली.
या सभेमध्ये ईव्हीएम मशीन ऐवजी सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात. अशी मागणी करण्यात आली होती.
सिमोन ठकाजी जगताप यांनी ग्रामसभेत याविषयी सूचना केली,व शामकांत भाऊसाहेब कातोरे यांनी त्यास अनुमोदन दिले होते .त्यावर उपस्थित ग्रामस्थांमध्ये साधक बादक चर्चा होऊन हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता.

या ग्रामसभेतील ठराव क्रमांक पाच तीन नुसार हा ठराव संमत झाला. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी ईव्हीएम मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावेत.अशी मागणी निमगाव कोऱ्हाळे ग्राम सभेत करण्यात आली होती व ती मंजूर झाली होती. ग्रामस्थांचे म्हणणे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असेच होते. असे यावरून दिसते. पण ही मागणी शासनाने, निवडणूक आयोगाने मनावर घेतली नाही.

त्यामुळे झालेल्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन वर अनेक ठिकाणी संशय निर्माण होत आहे. तशी चर्चा होत आहे. जर ईव्हीएम मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपरवर या निवडणुका झाल्या असत्या तर अशी सरकार ,व निवडणूक आयोग याविषयी संशयास्पद भूमिका नागरिकांची राहिली नसती.

येथून पुढील निवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात . यात निवडणूक आयोगाची अडचण काय आहे? असा सवालही त्यांनी केला असून येणाऱ्या निवडणुका या बॅलेट पेपर वरच घेण्यात याव्यात. अशी परत एकदा मागणी सिमोन ठकाजी जगताप यांनी प्रसिद्धीला दिलेल्या एका पत्रकाद्वारे केली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button