
लोकसभेच्या निवडणुकीतुन पराभुत होवुन डोक्यावर मानसिक परिणाम झालेले काही लोक काल एका भाषणात म्हटले की विरोधकांकडे पैसे नाहीत……हे ते खरे बोलले कारण आम्ही शेतक-यांची मुले आहोत. आमचा कष्टाचा पैसा आहे. अदानींकडुन आम्ही पैसे आणत नाही. अदानींच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणुन जात नाही.
तुम्हाला असलेला सत्तेचा माज व पैशाची मस्ती राहाता न.पा.ची निवडणुक गणेश कारखान्याची निवडणुक व नुकतीच झालेली लोकसभेची निवडणुक यात सामान्य जनतेने तुमची जिरवली फक्त पैशाने निवडणुका जिंकता येत नाहीत हे दाखवुन दिले.
आमच्या परिवाराकडे कुठले साखर कारखाने, शैक्षणिक संस्था, मेडीकल कॉलेज, इंजिनियरींग कॉलेज, आमदारकी, खासदारकी, जिल्हापरिषद, मंत्रीपदे नाहीत. तुमच्याकडे शासनाच्या तिजोरीतुन तसेच शेतक-यांना लुबाडुन कमवलेली कोट्यावधी रु.ची बेहिशोबी मालमत्ता आहे.
आमच्या कुटुंबाने शासकीय जागांवर डल्ला मारुन कोट्यावधी रु.च्या बिल्डींग बांधलेल्या नाही. आमचा मुख्य वडीलोपार्जित व्यवसाय शेती आहे. माझे वडील हाडाचे शेतकरी आहेत. मी ही शेतकरी आहे. त्यामुळे शेतक-याचा पैसा हा कष्टाचा व घाम गाळुन कमवलेला असतो.
चार-चार पिढ्या गेल्या तरी तुम्हाला निवडणुकीच्या वेळी मुरुम टाकावा लागतो,,,दारु व मटन द्यावे लागते यापुढे लोक तुमचा हा फंडा निवडणुकीत चालु देणार नाहीत.
आमच्या विरोधकांनी आम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महिलांनी येवु नये म्हणून वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला परंतु कोणत्याही यंत्रणेला व दडपशाहीला बळी न पडता मोठ्या संख्येने स्वयंस्पुर्तीने महिला त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहील्या.
कार्यक्रमाला महिला वाहून आणण्यासाठी आम्हाला कुठलीही यंत्रणा लावण्याची गरज पडली नाही.
जिरायत भागातील निळवंडेचे कालवे व शिर्डी संस्थानच्या कामगारांना 2009 मध्ये तुम्ही विरोध केला.
साईबाबांचे हॉस्पीटल मोठे का होवु दिले जात नाही तेथील डॉक्टर का पळविले जातात त्याचे कारण तुम्हीच जाहीरपणे सांगितली की मला आता शिर्डी 200 खाटांचे हॉस्पीटल काढायचे आहे. तुमची दुकानदारी चालण्याकरीता गोरगरीबांसाठी असलेले साईबाबांचे हॉस्पीटल बंद करण्याचे पाप करु नका.
रुई गावात मला बंदी घाला याचा बोलविता धनी कोण आहे त्यांच्या पोटातील मळमळ बाहेर निघाल्यावर लोकांना समजले.
पिता-पुत्रांची हुकुमशाही व हिटलरशाही विरोधात माझा लढा चालुच राहील व तुम्हाला सत्तेचा आलेला माज व पैशाची मस्ती शिर्डी मतदार संघातील जनता सहन करणार नाही