Letest News
श्री साई निर्माण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी अनोख्या उपक्रमातून साजरी केली ' रक्षाबंधन ' भाजपाचे माजी जिल्हा पदाधिकारी बंडू शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा महिला विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल मुख्यमंत्री सहाय्यता निधी अनेक रुग्णांसाठी ठरला आशेचा किरण ! लाभार्थी रुग्णांनी व्यक्त केल्या कृतज्ञ... नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर येथे उत्साहात स्वागत ! रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे... शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांची बदली त्याच्या जागी अमोल भारती यांची वर्णी साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीन... शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुध्द मकोका कायदयान्वये कारवाई नगर मनमाड रोडवरील हॉटेल मध्ये खंडणीसाठी गुंड्यांचा हैदोस  शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करा...
अ.नगरक्राईम

maharashtra news:-महंत रामगिरी महाराजांच्या जीवितास धोका? शासनाने झेड प्लेस सुरक्षा देण्याची गरज इम्तियाज जलील 

Mahant Ramgiri Maharaj's life threatened? Imtiaz Jalil on the need for government to provide Z Place security

शिर्डी प्रतिनिधी 

sai nirman
जाहिरात

महंत रामगिरी महाराजांचा जीव धोक्यात असल्याचा इशारा देत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारने त्यांना झेड प्लस सिक्युसिटी देण्याचे आवाहन केले. हे आम्ही नाही तर ज्यांच्या सांगण्यावरून तुम्ही मुस्लिम धर्म आणि धर्मगुरूंबद्दल बोलले तेच लोक तुमच्या जिवाशी खेळायला मागेपुढे पाहणार नाही आणि आमचे नाव पुढे करतील, असे माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

DN SPORTS

kamlakar

सत्तेसाठी हे लोक काहीही करू शकतात, असे जलील म्हणाले. एकूणच जलील यांच्या इशाऱ्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. रामगिरी महाराजांविरुद्ध ५८ एफआयआर दाखल होऊनही पोलिसांनी कारवाई केली नाही. मुख्यमंत्री उलट बोलतात की रामगिरी महाराजांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही.

त्यामुळे आम्ही सरकारला ५ दिवसांचा वेळ रामगिरी महाराजांवर कारवाई करण्यासाठी देत आहोत. सहाव्या दिवशी आम्ही मुंबईकडे कूच करू, राज्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी गाड्या तयार करून ठेवा. मुंबईला जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना संविधान भेट देऊ. पोलिसांना त्यांनी जेव्हा पदाची शपथ घेतली त्या शपथेची प्रत देऊ, असे जलील म्हणाले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत जलील म्हणाले, की रामगिरी महाराजांनी आता अलर्ट राहावे. थोडेही खुट्ट झाले तरी पहावे, की आपल्या जिवाला काही धोका तर नाही. आम्ही त्यांच्या जवळही जाणार नाही. तर तेच लोक असतील ज्यांच्या सांगण्यावरून त्यांनी वक्तव्य केले, असे जलील म्हणाले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button