Letest News
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे... शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांची बदली त्याच्या जागी अमोल भारती यांची वर्णी साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीन... शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुध्द मकोका कायदयान्वये कारवाई नगर मनमाड रोडवरील हॉटेल मध्ये खंडणीसाठी गुंड्यांचा हैदोस  शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करा... तत्कालीन अकार्यक्षम पोलीस निरीक्षक दिनेश आहेरचा कारनामा सहा जिवंत काडतूस जमा करून एक काडतूस केला गाय... स्थानिक निवडणुकी साठी शिवसैनिकाणी सज्ज रहा अपहरणं करून डोक्याला बंदूक लावत पन्नास लाखाच्या चेकवर सही करून घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश हिरे सुवर्णविजेते पदकचे माणकारी
क्राईमशिर्डी

शिर्डी नगर परिषदेचा हिटलर शाही कारभार चोर सोडून संन्यासाला फाशी याच्याकडे पालकमंत्री लक्ष देतील का

शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी शहरातील पिंपळवाडी रोड जवळील अण्णाभाऊ साठे नगर मधील रहिवाशांचे शिर्डी नगरपरिषदेने पिण्याचे पाणी अचानक नळ कनेक्शन कट करून बंद केले असल्याने येथील रहिवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून शिर्डी नगरपरिषदेने आम्हाला पूर्ववत पिण्याचे पाणी देण्याचे त्वरित सुरू करावे,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

अन्यथा येत्या गुरुवारी शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचा हंडा मोर्चा काढण्यात येईल. तसेच येथील रहिवासी या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करतील .असा इशाराही अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवाशांनी व महिलांनी दिला आहे.
शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात येथील रहिवाशांनी म्हटले आहे की,आम्ही गेल्या ३० ते ४० वर्षांपासून शिर्डी येथील अण्णाभाऊ साठे नगर येथे राहतो. सन 1995 च्या अगोदर पासून आम्ही तेथे राहत आहोत.

घरपट्टी ही आम्ही भरतो. पिण्याचे पाणी नगरपरिषदेमार्फत आम्हाला अनेक वर्षापासून मिळते‌ पाणीपट्टीही आम्ही भरतो. असे असताना ऐन उन्हाळ्यात आम्हाला शिडीं नगर परिषदेने आम्ही राहत असलेल्या ठिकाणी शासनाची जागा असल्याने ती जागा येत्या १५ दिवसात खाली करून देण्यासाठी नोटीस दिलेली आहे.

आणि ज्या दिवशी ही नोटीस दिली आहे. त्याच दिवशी आमचे पिण्याचे पाणी बंद करून टाकल्याने आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गेल्या पाच सहा दिवसापासून आम्हाला पिण्याचे पाणी नाही.आमच्या महिला नगर परिषद कार्यालयात गेल्या असता तेथील संबंधित अधिकारी गायकवाड यांना आमचे पाणी का बंद केले? अशी विचारणा केली असता गायकवाड यांनी आमच्या महिलांना सांगितले कि ,

आम्हाला मुख्याधिकारी साहेबांनी पाणी बंद करण्याचे सांगितले आहे. वास्तविक पाहाता नगर परिषद कोणालाही पिण्याच्या पाण्या पासून वंचित ठेऊ शकत नाही. साईबाबांनी कोणालाही उपाशी ठेवले नाही. मात्र आता साईबाबांच्या शिर्डीत नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी अण्णाभाऊ साठे नगर मधील गोरगरीब मागासवर्गीयांना व येथील नऊ कुटुंबांना जाणीवपूर्वक ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाणीचे कनेक्शन कट करून पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे.

नगरपरिषद हिटलरशाही पद्धतीने काम करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आमचे बंधू आहेत. त्यांनी आम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये दिले आहेत. मात्र हे पंधराशे रुपये आम्हाला नाही दिले तरी चालतील मात्र पिण्याचे पाणी देऊन आमची, आमच्या वृद्ध माता पिता, लहान मुले, घरातील सदस्यांची तहान भागवावी. असे भावनात्मक आवाहन या निवेदनातून करत नगरपरिषदेने आम्हाला पिण्याचे पाणी त्वरित पूर्ववत सुरू करावे.

आम्ही विकत पिण्याच्या पाण्याचा टँकर घेऊ शकत नाही .आमची तशी परिस्थिती नाही आम्ही मागासवर्गीय, गोरगरीब आहोत. असे म्हटले असून जर उ‌द्या बुधवारी सकाळी आम्हाला पिण्याचे पाणी मिळाले नाहीतर आम्ही अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर परवा गुरुवारी हंडा मोर्चा काढून ठिप्या आंदोलन करू.

असा इशारा या निवेदनात दिला असून या निवेदनावर समीर रामचंद्र वीर,अंबादार कांबले,सिताराम रोकडे,मधुकर वाघमारे, रविंद्र भोडंगे, दगू कांबळे, बबन रामा शिरसाट, सोमनाथ आरणे, आदींसह महिलांची नावे आहेत .

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button