Letest News
शिर्डीत हरवलेला ‘आयफोन’ साईभक्तेला परत शिर्डी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी साईचरित्र पारायणाची भक्तिमय सांगता आज सायंकाळी शिर्डीत पोथीची भव्य मिरवणूक साईचरणी कोते-गोंदकर परिवाराची श्रद्धेची लाखमोलाची ओंजळ!श्री साईचरित्र पारायण सोहळ्यासाठी दोन्ही परिव... विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियस... साईभक्तांची लूट थांबवणार कोण? वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर नामदार विखेंच्या आदेशाची... चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी शिर्डीतील गुटखा तस्करीचा सूत्रधार कोण? १२ आरोपींनंतर आता ‘आका’पर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणार का? गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठ... डॉ. सुजय विखेंचा मेंदू खराब झाला’- रोहित पवारांचा बोचरा पलटवार उदयपूर ते शिर्डी सातवी पदयात्रा भक्तिभावात पूर्ण- साईभक्त मोहित आचार्य यांचे शिर्डीत आगमन
अ.नगरराजकीय

वाळूमाफीयांची गुंडगिरी गाडून टाकण्यासाठी मला विजयी करा….. डॉ. राजेंद्र पिपाडा.

शिर्डीसारख्या पवित्र भूमीमध्ये राजकीय वरदहस्त लाभलेल्या वाळूमाफियांची गुंडगिरी प्रचंड वाढली असून त्यांना राजकीय अभय मिळाले आहे. वाळूमाफीयांच्या गुंडगिरी आणि दहशती मुळे या परिसरातील सामान्य नागरिक त्रस्त झालेले आहेत. या वाळूमाफियांना कायमचे गाडून टाकण्यासाठी शिर्डी विधानसभा मतदार संघातील सुज्ञ मतदारांनी या निवडणुकीत मला प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


डॉ. राजेंद्र पिपाडा हे अपक्ष म्हणून शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित असून त्यांना आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान मंतदारांशी संपर्क साधतांना अनेक ठिकाणी या भागामध्ये गुंडगिरी करणाऱ्या वाळूतस्करांच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी अनेक मतदारांनी डॉ. राजेंद्र पिपाडा यांना विनंती केली आहे. आपण निवडून आल्याबरोबर या भागातील वाळूमाफियांना कायमचे नेस्तनाबूद करणार आहोत, अशी ग्वाही त्यांनी मतदारांना दिली आहे.


मागील अनेक वर्षे राजकीय सत्ता एकाच कुटुंबाकडे असल्यामुळे त्यांनी अनेक वाळूमाफीया तयार करून आपल्या राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी त्यांचा वापर केलेल्या आहे. गुंडगिरीच्या जोरावर त्यांनी आपले राजकीय साम्राज्य उभे केले आहे. या वाळूमाफीयांच्या जोरावर त्यांचे राजकारण सुरक्षित झालेले आहे. ही प्रवृत्ती संपविणे ही काळाची गरज असून तिच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी आपण माझे हात बळकट करा असे डॉ. पिपाडा यांनी मतदारांना आवाहन केले आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button