Letest News
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप... राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप) सुनील निवृत्ती पाटील शिंदे यांचा प्रचंड दावा : “प्रभाग २ मध्ये नंदूभाऊंचा विजय ठरलेलाच… विरोधकांची ब... एआय बनावट वन्यप्राणी व्हिडिओवाल्यांना थेट जेल — एसपी सोमनाथ घार्गे यांची कडक सूचना”
अ.नगरक्राईम

बॉबी व भिंगरीला आवाहन” — मदारी काळेंचा थेट इशारा!

कोपरगाव तालुक्यातील राजकारण, साखर कारखाने, आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कांवरून नेहमीच वादंग पेटत असतो. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संजय बबुताई भास्करराव काळे यांनी नुकतेच केलेले वक्तव्य आता चर्चेचा विषय ठरत आहे.
त्यांनी थेट शब्दांत म्हटलं —

sai nirman
जाहिरात

“बॉबी आणि भिंगरी, तुम्ही दोन्ही मदिरेचे ब्रॅन्ड आहात… आणि मी मदारी!
तुमच्या जाहिरातीसाठी माझं नाव चुकून घेऊ नका.
कारण मदिरा घेतलेल्याला ठिकाण्यावर आणायचं काम मदारीच करतो!”

DN SPORTS

kamlakar


🌾 शेतकऱ्यांच्या घामावर मदिरा…!

काळेंनी साखर कारखान्यांतील अन्यायावर जोरदार प्रहार केला. त्यांनी सांगितले —

“मदिरा बनवण्यासाठी शेतकऱ्यांचे काटे मारले गेले.
ऊस जाळला गेला, रिकव्हरी लपवली गेली,
वीज निर्मिती व मळीचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत.
ऊस उत्पादक सभासदांनी घेतलेली जमिनी खासगी शैक्षणिक संस्थांना मोफत वाटल्या गेल्या.
इथेनॉलचा नफा, भुशाचे पैसे — काहीही शेतकऱ्यांच्या हातात पोहोचले नाही.”

त्यांच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांचा हक्क हिरावून घेत मदिरा उद्योगातील काही मंडळींनी अफाट संपत्ती निर्माण केली, आणि आता ती संपत्तीच “राजकारणाला पोसते” आहे.


⚙️ “कोपरगाव नगरपालिका म्हणजे घोटाळ्यांचं घर!”

काळेंनी पुढे सांगितलं की, बॉबी आणि भिंगरीच्या मदिरेच्या नशेत कोपरगाव नगरपालिकेत घोटाळ्यांचा महापूर आला आहे.

“नगरपालिकेतील विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे, ठेकेदारांच्या माध्यमातून पैसा खेळला गेला आहे.
शहर विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल केली जाते आहे.”

त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, या सर्व घोटाळ्यांचे पुरावे त्यांच्या जवळ आहेत आणि जर त्यांचं नाव घेण्यात आलं, तर ते सर्व पुराव्यासह जनतेसमोर आणले जातील.


🏡 “अल्पभूधारक नेता… आणि दिडशे एकर जमिनीचा नातू?”

काळेंनी आणखी एक मोठा आरोप करत म्हटलं —

“माझ्या नावावर अडीच एकर जमीन आहे,
आणि जो स्वतःला अल्पभूधारक म्हणतो त्याच्या नातवाने त्याच गावात दिडशे एकर जमीन खरेदी केली!
हे कसं शक्य आहे?
हाताला घट्टे पडलेले शेतकरी आज भूमिहीन झाले,
आणि मातीत हात न घालणारे नातू आता जमीनदार झाले!”

त्यांच्या या वक्तव्यानंतर ग्रामस्थांमध्ये आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.


⚔️ “निवडणूक लढा, पण सत्य ऐकण्याची तयारी ठेवा!”

संजय काळेंनी थेट इशारा दिला —

“तुम्ही निवडणूक लढा,
लुटूपुटूची लढा लढा,
पण माझं नाव घेतलं तर पुराव्यासह सत्य ऐकण्याची तयारी ठेवा!
कोपरगावच्या विकासाचं खोटं चित्र दाखवून तुम्ही लोकांना फसवू शकत नाही.”

त्यांनी पुढे सांगितलं की, जनतेचा विश्वास विकत घेतला जात नाही; तो वागणुकीने जिंकावा लागतो.
त्यामुळे कोपरगावात आगामी निवडणूक फक्त राजकीय नव्हे, तर “जनतेचा न्याय” ठरावी, असा त्यांचा संदेश आहे.


🔥 कोपरगावात खळबळ — राजकीय वातावरण तापले!

संजय काळे यांच्या या तीव्र वक्तव्यामुळे कोपरगावात मोठी खळबळ उडाली आहे.
या वक्तव्यानंतर बॉबी व भिंगरी गटाकडून अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिक आणि शेतकरी वर्ग काळे यांच्या पाठिशी उभा राहताना दिसत आहेत.
या निवडणुकीत जनतेचा न्याय आणि सत्याचा आवाज कोण जिंकतो, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button