Letest News
शिर्डीत ‘जमीन सौदा’ बॉम्ब फुटणार? भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातच्या ५० कोटींच्या व्यवहारावर पोलिसांची ... पोटनिवडणुकीत माध्यमांवर कडक नियम-जाहिरातींसाठी पूर्व मंजुरी अनिवार्य नाशिक प्रकरणात खळबळ! भोंदू बाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ – ‘५ नरबळी’चा धक्कादायक संशय शिर्डीतील ‘क्लासिक आइसक्रीम’ची जागतिक भरारीकडे वाटचाल-नूतन आइसक्रीम युनिटचे भव्य उद्घाटन   ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ  वाघचौरे यांना फसवण्याचा... सुपर ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट asp वाघचौरे यांना फसवण्याचा प्रयत्न फसला! ६,५०० रुपयांच्या लाचेप्रकरणी जिल्हा परिषद अभियंता जाळ्यात! ACB ची धडक कारवाई शिर्डीत ११५ वा श्रीरामनवमी उत्सव-लाखो साईभक्तांच्या स्वागतासाठी भव्य तयारी पूर्ण! खरातचा काळा खेळ उघड! शिर्डी पोलिसांची गुप्त मोहीम ठरली निर्णायक शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई
राजकीयशिर्डी

सावधान! तुम्ही कुणाला मतदान करता आहात? साईबाबांचे नाही झाले… ते तुमचे कधी होणार?

शिर्डीच्या राजकारणात आज सर्वात मोठा प्रश्न उभा ठाकलाय —
“शिर्डीला लुटणाऱ्यांना पुन्हा संधी का?”

sai nirman
जाहिरात

ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र भुजबळ यांनी एका तडाखेबाज विधानातून गेल्या २५ वर्षांच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करत मतदारांना सावधान केले आहे.


२००१ पासून सुरू झालेला लुटारूंचा काळाचक्र

DN SPORTS

२००१ साली नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची सत्ता शिर्डीत आली.
परंतु त्या सत्तेचा दुरुपयोग करून टोलनाक्याचे ठेके, ५३ आरक्षणांवर डल्ला, ठरावांची रद्दबातल…
या सर्व भ्रष्ट कामातून कोट्यवधी रुपये शिर्डीतून बाहेर गेले.

सत्ता मिळाली की पैसा
आणि पैशातून पुन्हा सत्ता —
याच योजनेने काही मंडळी २५ वर्षे रंगलेली!

आज हीच मंडळी वेगवेगळे केस पांढरे–काळे करून पुन्हा “विश्वासू उमेदवार” म्हणून मतदारांवर लादले जात आहेत.


गद्दारी, स्वार्थ आणि राजकीय पॉलिश — सर्व काही उघड!

ज्यांनी साईबाबांची झोळी रिकामी केली…
ज्यांनी राधाकृष्ण विखेंची पाठीत खंजीर खुपसली…
तेच लोक आज डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नावाने वोट मागायला उभे!

kamlakar

अहो, ज्यांनी खासदार–आमदारांना देखील सोडलं नाही, त्यांना साधा मतदार काय भावणार?
शिर्डीमध्ये लूट करणारा “पॉलिशवाला” आजही पुढाऱ्यांच्या वेषात उभा.


मुख्याधिकार्‍यांसह अय्याश्या! मंचावर नाव घेऊन कबुली!!

याच मंडळींतील एक उमेदवार तत्कालीन मुख्याधिकारी सोबत
नाशिक, मुंबई, लोणावळा येथे मौजमजा करत होता —
हे फक्त आरोप नाहीत,
तर शिर्डीतील एका नेत्याने सार्वजनिक सभेत नाव घेऊन कबूल केलेली गोष्ट!


सात खून, तडीपार गुन्हेगारांचे आश्रय, पासेसचा काळाबाजार…

शिर्डीत गेल्या पाच वर्षांत घडलेले काळेकुट्ट अध्याय:

७ निष्पाप लोकांचे खून

तडीपार सराईत गुन्हेगारांना आश्रय

साई संस्थानातील चोरी

व्हीआयपी पासेसचा काळाबाजार

बनावट देणगी पावत्या

वर्षानुवर्ष एकाच जागी बसलेले भ्रष्ट अधिकारी–कर्मचारी

भाविकांकडून लाखो रुपयांची लूट

या प्रत्येक प्रकरणात राजेंद्र भुजबळ यांनी निर्भीडपणे आवाज उठवला —
तोही उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत.


“मी पत्रकारच नाही… साई संस्थानचा चौकीदारही आहे!” — राजेंद्र भुजबळ

“शिर्डीत चुकीचं काम करणाऱ्याला मी कधीही सोडणार नाही.
सत्ता येईल–जाईल, पण मी सत्यासाठी लढत राहणार.”

असा निर्धार व्यक्त करत भुजबळ म्हणाले—

“राजकारण माझा पिंड नाही.
मला हवाय — स्वच्छ शिर्डी! सुंदर शिर्डी!! सुरक्षित शिर्डी!!!
रामराज्य हवे आहे… गुंडाराज नव्हे!”


“माझ्याकडे गमविण्यासाठी काही नाही! पण मी टांगा पलटी करू शकतो!!”

मतदारांनी प्रामाणिक पत्रकाराकडे दुर्लक्ष केलं तरी त्याला काही फरक नाही.
परंतु —

“माझ्या लिखाणात आजही अशी ताकद आहे
की मी राजकारणातील संपूर्ण टांगा पलटी करू शकतो.”

हा दमदार इशारा देत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र भुजबळ यांनी
शिर्डीतील मतदारांना जागे होण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button