
शिर्डी प्रतिनिधी/ जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डीतील साईबाबा मंदिर पंचांगानुसार रविवार, दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी भाद्रपद शुद्ध पौर्णिमा, शके १९४७ रोजी खग्रास चंद्रग्रहण येत असून ते भारतासह इतर देशांतही दृश्यमान होणार आहे. या ग्रहण काळात श्री साईबाबा समाधी मंदिरातील दैनंदिन कार्यक्रमात आवश्यक बदल करण्यात आले आहे
ग्रहण काळामध्ये श्रींच्या शेजारतीची वेळ येत असल्यामुळे, समाधी मंदिरातील शेजारती रात्री ९.१५ वाजता सुरू होईल. शेजारतीनंतर ग्रहण सुरू होण्यापूर्वी समाधी मंदिर बंद होणार आहे. सर्व साईभक्तांनी या बदलाची नोंद घ्यावी तसेच संस्थानच्या कार्यक्रमांमध्ये झालेल्या बदलास सहकार्य करावे,
असे आवाहन करण्यात आले असून साईबाबा संस्थान माध्यमातून इतर सर्व सुविधा सुरू राहणार आहे असे आवाहन साईबाबा संस्थानच्या माध्यमातून करण्यात आले आहे

