Letest News
सिब्बलांच्या मागणीने ठाकरेंच्या मनातील ‘धनुष्यबाण’ बाहेर? श्रीकांत शिंदेंचा शिर्डीतून घणाघात! दहीहंडी फोडून पारायण सोहळ्याची सांगता ८ हजार २०० पारायणार्थींचा सहभाग — साईनामाच्या जयघोषाने शिर्डी ... शिर्डीत हरवलेला ‘आयफोन’ साईभक्तेला परत शिर्डी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी साईचरित्र पारायणाची भक्तिमय सांगता आज सायंकाळी शिर्डीत पोथीची भव्य मिरवणूक साईचरणी कोते-गोंदकर परिवाराची श्रद्धेची लाखमोलाची ओंजळ!श्री साईचरित्र पारायण सोहळ्यासाठी दोन्ही परिव... विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियस... साईभक्तांची लूट थांबवणार कोण? वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर नामदार विखेंच्या आदेशाची... चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी शिर्डीतील गुटखा तस्करीचा सूत्रधार कोण? १२ आरोपींनंतर आता ‘आका’पर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणार का? गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठ...
शिर्डी

आमचे दादा गेले… निशब्द” — महिंद्रा शेळके पाटील यांची आदरणीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली

आदरणीय अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्र राज्याचे प्रचंड नुकसान झाले असून, कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महिंद्रा शेळके पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


“आमचे दादा गेले… निशब्द,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, अजितदादा आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी नेहमीच मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते. शिस्त, कामाचा ध्यास आणि वेळेची किंमत याचे महत्त्व आम्ही दादांकडूनच शिकलो, असे त्यांनी नमूद केले.


अजितदादा हे केवळ एक प्रशासक किंवा राजकीय नेते नव्हते, तर आपल्या कार्यपद्धतीतून सातत्याने प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कामातील शिस्त, स्पष्टता आणि निर्णयक्षमता ही सर्वांसाठी आदर्शवत होती. आम्ही आमच्या संपूर्ण कुटुंबासह नेहमीच त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहत आलो आहोत, असेही महिंद्रा शेळके पाटील यांनी सांगितले.


“दादा, तुमची कार्यपद्धती, तुमची शिस्त आणि तुमची प्रेरणा आमच्या कुटुंबाच्या विचारांमध्ये कायम जिवंत राहील,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या श्रद्धांजलीत भावना व्यक्त केल्या.
शेवटी त्यांनी “भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 ॐ शांती 🕊️” असे म्हणत आदरणीय अजितदादांना अखेरचा निरोप दिला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button