
“स्नेहसंमेलन आपल्याला केवळ भूतकाळाची आठवण करून देत नाही, तर पुढील काळातही असेच एकत्र राहण्याची प्रेरणा देते. आपण समाजासाठी, देशासाठी आणि मानवतेसाठी काहीतरी अर्थपूर्ण करण्याचा संकल्प याच मंचावरून करूया,” असे मनोगत डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी व्यक्त केले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दुसरे मेडिकल कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा Shirdi येथे मोठ्या उत्साहात पार पडला. दोन दिवसीय या कार्यक्रमात सन 1975 ते 1988 या कालावधीतील सुमारे 70 डॉक्टर उपस्थित होते.
या स्नेहसंमेलनाचे आयोजन डॉ. प्रकाश कोळपे यांच्या नियोजनातून आणि परिश्रमातून दिमाखात पार पडले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. जे. डी. पाटील उपस्थित होते.
या वेळी डॉ. प्रकाश कोळपे, डॉ. राजेंद्र पिपाडा, डॉ. सुधीर गोडबोले, डॉ. अजित वहीकर, डॉ. राधा मॅडम, डॉ. मुकुंद भणगे, डॉ. गुंजाळ (कोळपेवाडी), सौ. डॉ. राजेश्री नवलाखे, डॉ. प्रल्हाद उडान, डॉ. रंगरेज, डॉ. अरुण निकम, डॉ. विजय सेनानी, डॉ. भुरे, डॉ. कैलास पाटील, डॉ. अवताडे, डॉ. रवींद्र पांडे, डॉ. लक्ष्मीकांत गोमटे आदींसह एकूण 70 डॉक्टर उपस्थित होते.
राजकीय क्षेत्रात पुढे जात डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर राज्यभर वेगळी ओळख निर्माण करून राजकीय पटलावर ठसा उमटवला आहे, असे मत माजी प्राचार्य डॉ. जे. डी. पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी डॉ. प्रकाश कोळपे यांनी गेल्या दहा वर्षांत उभारलेल्या शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील भव्य कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांनी आयुर्वेदिक कॉलेज, फार्मसी कॉलेज, नर्सिंग कॉलेज तसेच मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे उभारून उल्लेखनीय प्रगती साधली असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी आपल्या भाषणातून जुन्या आठवणींना प्रेमळ उजाळा दिला. त्या आठवणींमुळे उपस्थितांच्या मनात भावनिक आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले. भूतकाळातील सहवास, मैत्री आणि अनुभव त्यांनी जिवंतपणे उलगडले, ज्यामुळे स्नेहसंमेलन अधिक आपुलकीचे आणि संस्मरणीय ठरले.
प्रमुख पाहुणे डॉ. जे. डी. पाटील यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांची प्रगती पाहून आनंद व्यक्त केला व सर्वांना उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. हा स्नेहमेळावा मागील वर्षी Jalna येथे आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी हा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुढील वर्षीचा मेळावा Nashik येथे घेण्याचे ठरले आहे.
शिर्डीत पार पडलेल्या या दोन दिवसीय स्नेहसंमेलनात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असून सर्वजण पुढील वर्षाच्या मेळाव्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

