Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
क्राईमशिर्डी

मिस्टर ओला काय चाललं आहे तुमच्या जिल्ह्यात शिर्डी सारख्या पावन भूमीत गुन्हेगार रक्त संडवताय गल्ली मोहल्यात

शिर्डी ( प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणारी शिर्डी ही साईबाबांच्या पदस्पर्शने पुनीत झालेली भूमी आहे .ह्या भूमीत  श्री.साईबाबांचे दर्शनासाठी देश विदेशातून साईभक्त दर्शनासाठी येत असतात. येथे पूर्वी पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश असतांना येथील गुन्हेगारी संपुष्टात आणण्याचे प्रयत्न केल्याने शिर्डीतील गुन्हेगारी संपली होती. त्यांनी येथील गुन्हेगारांना आपल्या खाकी वर्दीचा वापर करून चांगल्या चांगल्या् सराईत गुन्हेगारांना जेल ची हवा दाखवली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

परंतु त्यांची बदली झाली. त्या नंतर काही काळ गेला आणि अ.नगर जिल्ह्याला अति कर्तव्यदक्ष म्हणून ज्यांची ख्याती होती ते  पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची नियुक्ती झाली. यांची नियुक्ती झाल्यावर जिल्हा वासियाना वाटले कि, राकेश ओला यांना संपूर्ण जिल्ह्याची माहिती आहे, कारण कि ओला यांनी ह्यापूर्वी नगर जिल्ह्यात  श्रीरामपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीला आळा बसेल .कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याचा प्रयत्न होईल. मात्र सध्या तरी तसे होताना दिसत नाही.

असे जिल्ह्यातील नागरिकांकडून आता बोलले जात आहे.
  अहिल्यानगरच्या इतिहासात प्रथमच भ्रष्टाचार, खंडणी आदीसह  हफ्त्याच्या मुद्दा धरून अ. नगरच्या खासदाराला उपोषण करावे लागले होते.आणि अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारी चोऱ्यांचे प्रमाण वाढले. त्यासाठी आंदोलन करावे लागले. असे असताना येथे जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी कमी होत नाही.

विशेष म्हणजे शिर्डी सारख्या पवित्र भूमीत देश-विदेशातून साईभक्त येत असतात .हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे .मात्र येथे राजरोसपणे मारामाऱ्या ,गुंडगिरी, सुरू आहे. पाकीट मारी , चैन स्नेचिंग. साई भक्तांच्या गाड्यांच्या काचा फोडून मौल्यवान  वस्तूंची चोरी, मोटरसायकल चोरी, परिसरातील आठवडे बाजारांमधून मोबाईल चोऱ्या, आदी प्रकार वाढले आहेत. चक्क दिवाळीच्या दिवशी गुन्हेगारांनी शिर्डीत आपापसात वार करून पोलिसांना जणू सलामी दिली आहे.

त्याची फिर्याद देखील शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल आहे. शिर्डी मध्ये व जिल्ह्यामध्ये अनेकदा आपापसात हाणामाऱ्या, अवैध मटका धंदे ,दारू धंदे, गांजा विक्री, सर्रास सुरू आहे, त्यामुळे गुन्हेगारी वाटत आहे, याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे लक्ष आहे की नाही? असा सवाल आता जिल्ह्यातील नागरिकांकडून होत असून गुन्हेगारीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button