Letest News
मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ... शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन जिल्हा कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात उत्साहाचा नवा संचार शिर्डी शहरातील समाजसेवक आणि साईभक्त जावेद भाई सय्यद यांचे दुःखद निधन शिर्डीच्या भवितव्यावर चिंतनाची गरज-राजकारण बाजूला ठेवून चिंतन बैठक घ्या” — प्रमोद गोंदकर
अ.नगरराजकीय

वाळूमाफीयांची गुंडगिरी गाडून टाकण्यासाठी मला विजयी करा….. डॉ. राजेंद्र पिपाडा.

शिर्डीसारख्या पवित्र भूमीमध्ये राजकीय वरदहस्त लाभलेल्या वाळूमाफियांची गुंडगिरी प्रचंड वाढली असून त्यांना राजकीय अभय मिळाले आहे. वाळूमाफीयांच्या गुंडगिरी आणि दहशती मुळे या परिसरातील सामान्य नागरिक त्रस्त झालेले आहेत. या वाळूमाफियांना कायमचे गाडून टाकण्यासाठी शिर्डी विधानसभा मतदार संघातील सुज्ञ मतदारांनी या निवडणुकीत मला प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


डॉ. राजेंद्र पिपाडा हे अपक्ष म्हणून शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित असून त्यांना आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान मंतदारांशी संपर्क साधतांना अनेक ठिकाणी या भागामध्ये गुंडगिरी करणाऱ्या वाळूतस्करांच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी अनेक मतदारांनी डॉ. राजेंद्र पिपाडा यांना विनंती केली आहे. आपण निवडून आल्याबरोबर या भागातील वाळूमाफियांना कायमचे नेस्तनाबूद करणार आहोत, अशी ग्वाही त्यांनी मतदारांना दिली आहे.


मागील अनेक वर्षे राजकीय सत्ता एकाच कुटुंबाकडे असल्यामुळे त्यांनी अनेक वाळूमाफीया तयार करून आपल्या राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी त्यांचा वापर केलेल्या आहे. गुंडगिरीच्या जोरावर त्यांनी आपले राजकीय साम्राज्य उभे केले आहे. या वाळूमाफीयांच्या जोरावर त्यांचे राजकारण सुरक्षित झालेले आहे. ही प्रवृत्ती संपविणे ही काळाची गरज असून तिच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी आपण माझे हात बळकट करा असे डॉ. पिपाडा यांनी मतदारांना आवाहन केले आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button