Letest News
साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य... शिर्डी सह राहता तालुक्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस-नागरिकांची धांदल उडाली साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा
राजकीयशिर्डी

ShirdiNews #RickshawIssue#शिर्डीत मीटरविना रिक्षांचा हैदोस-साईभक्तांची सर्रास लूट – प्रशासन झोपेत का?

शिर्डी :
राज्यात ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी शासन विविध योजना राबवत असताना साईनगरी शिर्डीत मात्र पूर्णपणे उलट चित्र पाहायला मिळत आहे. येथे शेकडो रिक्षा मीटरशिवायच धावत असून साईभक्तांकडून उघडपणे मनमानी भाडे उकळून त्यांची सर्रास लूट केली जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. विशेष म्हणजे ही लूट सर्वांसमोर सुरू असतानाही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दररोज हजारो साईभक्त शिर्डीत दर्शनासाठी येत असतात. रेल्वे स्थानक, बसस्थानक, मंदिर परिसर आणि शहरातील प्रमुख चौकांमध्ये रिक्षाचालकांकडून मीटर न लावता थेट भाविकांशी घासाघीस करून भाडे आकारले जात असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी अवघ्या काही अंतरासाठी 200 ते 500 रुपयांपर्यंत भाडे मागितले जात असल्याच्या तक्रारी भाविकांकडून होत आहेत.
नियमांनुसार प्रत्येक ऑटो रिक्षामध्ये मीटर बसविणे बंधनकारक आहे.

मात्र शिर्डीत अनेक रिक्षांमध्ये मीटरच नसल्याचे उघडपणे दिसत आहे. इतकेच नव्हे तर काही रिक्षा परवाना, नोंदणी किंवा अधिकृत कागदपत्रांशिवायच धावत असल्याचीही चर्चा शहरात आहे. त्यामुळे अधिकृत व नियम पाळणाऱ्या रिक्षाचालकांवर अन्याय होत असून त्यांची उपजीविकाही धोक्यात आली आहे.


शिर्डी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील धार्मिक पर्यटन स्थळ असताना अशा प्रकारे भाविकांची लूट सुरू असणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब मानली जात आहे. परिवहन विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी संयुक्त कारवाई करून मीटरविना धावणाऱ्या तसेच बोगस रिक्षांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


दरम्यान, राज्य शासन रिक्षाचालकांच्या कल्याणासाठी योजना राबवत असताना शिर्डीत मात्र नियमांची उघडपणे पायमल्ली होत असताना प्रशासन का गप्प आहे? असा संतप्त सवाल नागरिक व साईभक्तांकडून उपस्थित केला जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button