
विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. अंतरवाली-सराटीतील सभेत भाषण करताना त्यांनी तीन महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर महायुतीला मराठवाड्यात महागात पडला होता. आता विधानसभेला जरांगेंनी थेट निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केलेली आहे.
यावेळी त्यांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. ‘पहिला मुद्दा म्हणजे जिथे मराठा उमेदवार निवडून येण्याची पक्की खात्री असेल, तिथे उमेदवार उभा करायचा. दुसरा मुद्दा म्हणजे एससी, एसटीसाठी आरक्षित असलेल्या जागांवर आपण आपले उमेदवार द्यायचे नाहीत. तिकडे जो आपल्या विचाराचा असेल,
त्याला निवडून आणायचा. तिसरा मुद्दा म्हणजे जिथे आपला उमेदवार निवडून येत नसेल तिथे जो उमेदवार आपल्याला ५०० रुपयाच्या बाँडवर आपल्या मागण्यांशी सहमत असल्याचं लिहून देईल त्याला मतदान करायचं, नाहीतर पाडायचं,’ अशा घोषणा जरांगे यांनी केल्या आहेत. एका जातीच्या जोरावर सीट निवडून येत नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा.
मी समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करत आहे. ते जुळलं नाही तर मग अवघड आहे. तुम्ही अर्ज भरा. कोणाचे अर्ज माघारी घ्यायचे ते आपण नंतर ठरवू. अर्ज माघारी घेतला तर काही नुकसान होत नाही. अनामत रक्कम परत मिळते, असं जरांगे पाटील म्हणाले.