Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
Blog

जर तुमचेच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात गट असतील तर निवडणूक कशाला?–सौ.प्रभावती घोगरे

शिर्डी ( प्रतिनिधी) नुकत्याच तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये
दोन्ही गट तुमचेच, मग निवडणुका कशाला ?असा प्रश्न कृषीभूषण प्रभाताई घोगरे यांनी विखे पाटील यांचे नाव न घेता केला.
राहाता तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोनही गट तुमचेच होते तर निवडणुका कशाला घेतल्या. त्यामुळे प्रशासनावर अनावश्यक ताण, कार्यकत्यामध्ये हेवेदावे , शाब्दिक चकमकी,आर्थिक नुकसान झाले. कारखाने, बँका, मार्केट कमिटया, प्रवरा मुळा,निवडणुकासारख्या हया निवडणुका समन्वयातुन बिनविरोध का झाल्या नाही,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

असा सवाल कृषीभुषण प्रभाताई जनार्दन घोगरे यांनी केला आहे. राहाता तालुक्यातीलनुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुक
निकालाबाबत त्या म्हणाल्या की, तालुक्यातील संस्थेच्या निवडणुका कशासाठी? सर्व ग्रामपंचायत निवडणुका लावल्या जातात. यामुळे गावातील पालकमंत्र्यांच्या दोन गटात पार पडल्या. निवडणुकीत आपला मोठेपणा दाखवण्यासाठी या निवडणुका पार पडल्या. जर राजकीय विरोधकच दाखविण्यासाठी कार्यकर्त्याकडु नाही तर पालकमंत्र्याकडुन आपल्या संसार प्रपंचाची होळी आपल्याच कार्यकर्त्याना एकमेकांच्या विरोधात उभेकरून होते.

वारेमाप पैसा उधळला जातो.अनेक तरुण याकाळात व्यसनाधिन होतात. पाटर्या होतात. त्यामुळे अनेक पशुचा बळी जातो. प्रशासकीय कामे सोडुन शासकीय
यंत्रणा कामाला लागते. पालकमंत्र्यांच्या कारखाने, बँका, मार्केट कमिटी, मुळा प्रवरा या सारख्या संस्थाच्या निवडणुका
बिनविरोध केल्या जातात. मग जर प्रत्येक गावात सर्व आपलेच कार्यकर्ते आहेत तर निवडणूक का होत नाही,
निवडणुकामुळे कार्यकर्त्याच्या घराघरात वाद होतात, निवडणूक वरून एकमेकात दुश्मनी तयार होते. नंतर सुख, दुख:
, लग्नकार्य, अंत्यसंस्कार सारख्या बाबी मध्ये एकमेंकाना मदत न करणे पर्यंत हे राजकारण जाते.

kamlakar

जो गट निवडुन येतो तो हारतुरे घेतो, मात्र निवडणुकीत जो पराभूत होतो. त्याला विजयी झालेला गट किरकोळ समजतो. त्यामुळे आपापसात निवडणुकीवरून दुश्मनी तयार होते. तेव्हा युवकांनी सुध्दा समाजात जनजागृती केली पाहीजे. गावातल्या निवडणुका जर अशा
एकाच नेत्याच्या दोन गटात होणार असेल तर आपण यापासून अलिप्त राहायला हवे. संघर्ष, पार्टी, व्यसन, वायफळ खर्च टाळला पाहिजे व कुटुंबाची हानी टाळली पाहीजे. पालकमंत्र्यानी स्वतः च्या संस्थेच्या निवडणुका प्रमाणेच पुढील टप्प्यातील निवडणुका आपल्याच दोन गटात घेण्याऐवजी त्या समन्वयातुन बिनविरोध कराव्यात.असे मत कृषीभुषण प्रभाताई
घोगरे यांनी व्यक्त केले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button