Letest News
EXCLUSIVE: ‘कॅप्टन खरात’चा प्रभाव की संगनमत? साई संस्थान कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमागे मोठा कट असल्या... कामाच्या शोधात आलेल्या तरुणावर शिर्डीत रक्तरंजित हल्ला-पेरूच्या कारणावरून डोक्यात फळी घालून ठार मारण... EXCLUSIVE: भोंदू ‘कॅप्टन’चा आणखी एक कारनामा? साई संस्थानशी संबंधित कर्मचाऱ्याची संशयास्पद आत्महत्या भोंदू लिंगपिसाट अशोक खरातचा काळा कारभार उघड — कोट्यवधींच्या जमीन हडपगुन्हा दाखल-दोघे ताब्यात दोघे फर... साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण...
क्राईमशिर्डी

EXCLUSIVE: ‘कॅप्टन खरात’चा प्रभाव की संगनमत? साई संस्थान कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमागे मोठा कट असल्याचा संशय

शिर्डी | प्रतिनिधी (दैनिक साई दर्शन विशेष मालिका)
शिर्डीत समोर आलेल्या एका आत्महत्येच्या प्रकरणाने आता अत्यंत धक्कादायक वळण घेतले असून, साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत असलेल्या विकास रामदास दिवटे (वय 37) यांच्या मृत्यूमागे गंभीर संगनमत आणि दबावाचे आरोप पुढे येत आहेत. या प्रकरणात भोंदू ‘कॅप्टन खरात’चा थेट हस्तक्षेप असल्याचे आरोप असून, संस्थानमधील तत्कालीन उपकार्यकारी अधिकाऱ्याला हाताशी धरून मानसिक छळ केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहाता तालुक्यातील निमगाव को-हाळे येथील न्यू सेवाधाम हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या विकास दिवटे यांनी 9 जून 2022 रोजी रात्री आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुरुवातीला ही घटना वैयक्तिक कारणांमुळे झाल्याचे मानले जात होते. मात्र, आता या प्रकरणामागे मानसिक छळ, धमक्या आणि प्रभावशाली व्यक्तींच्या हस्तक्षेपाचे गंभीर आरोप समोर येत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

फिर्यादी राजेंद्र रामदास दिवटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विकास दिवटे यांच्यावर सतत मानसिक दबाव आणला जात होता. त्यांना विविध प्रकारे त्रास देण्यात येत होता, तसेच जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. या सर्व प्रकारामुळे ते प्रचंड तणावाखाली होते आणि पूर्णपणे खचून गेले होते.
या सगळ्यात सर्वात गंभीर बाब म्हणजे, भोंदू ‘कॅप्टन खरात’ने कथितरित्या विकास दिवटे यांच्यावर दबाव टाकत त्यांना त्रास दिल्याचे आरोप आहेत. पुढे या प्रकरणात असा संशय व्यक्त केला जात आहे की, ‘कॅप्टन खरात’ने साईबाबा संस्थानच्या तत्कालीन उपकार्यकारी अधिकाऱ्याला हाताशी धरून या संपूर्ण दबावयंत्रणेचा वापर केला. या कथित संगनमतामुळेच विकास दिवटे यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित कर्मचारीवर वारंवार मानसिक छळ, धमक्या आणि नोकरी गमावण्याचा दबाव टाकण्यात येत होता. या सर्व घटनाक्रमामुळे तो प्रचंड मानसिक तणावाखाली गेला होता. अखेर या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचा संशय अधिक बळावत आहे.


घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी ती जप्त केली आहे. या नोटमध्ये काही व्यक्तींचा थेट किंवा अप्रत्यक्ष उल्लेख असल्याची चर्चा आहे. मात्र, या नोटमधील मजकूर अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेला नाही. हा पुरावा समोर आल्यास प्रकरणाला निर्णायक वळण मिळू शकते.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, घटनेनंतर हे संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. संबंधित उपकार्यकारी अधिकाऱ्याचे नाव समोर येऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तडजोड करण्यात आल्याची कुजबुज असून, त्यामुळे या प्रकरणातील संशय अधिकच गडद झाला आहे.


⚠️ आत्महत्या की संगनमतातून घडलेला गुन्हा?
विकास दिवटे यांच्या मृत्यूकडे केवळ आत्महत्या म्हणून पाहता येत नाही. मानसिक छळ, दबाव आणि प्रभावाच्या गैरवापरामुळे हा प्रकार घडल्याचा गंभीर संशय व्यक्त होत आहे.
🔥 ‘कॅप्टन खरात’चा वाढता प्रभाव; संस्थानपर्यंत पोहोच?
शिर्डी परिसरात वारंवार वादात सापडणारे ‘कॅप्टन खरात’ हे नाव आता संस्थानच्या यंत्रणेशी जोडले जात असल्याने, या प्रकरणाची व्याप्ती अधिकच गंभीर बनली आहे.
🛑 प्रकरण दाबले गेले का? निष्पक्ष तपासाची मागणी तीव्र
आर्थिक तडजोडीच्या चर्चेमुळे हे प्रकरण दडपण्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

कर्मचारी संघटना गप्प; आता कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनीच न्याय द्यावा!
संस्थान कर्मचारी आत्महत्या… तरीही शांतता का?
एका संस्थानच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यासारखी गंभीर घटना घडूनही कर्मचारी संघटनांकडून कोणतीही ठोस भूमिका समोर आलेली नाही. एवढ्या मोठ्या घटनेवर संघटनांनी चकार शब्दही न काढल्याने संशय अधिक गडद होत असून, ही शांतता अनेक प्रश्न निर्माण करत आहे.
न्यायासाठी कोणी पुढे येणार का?
मयत कर्मचाऱ्यास न्याय मिळावा यासाठी ना संघटना पुढे येत आहेत, ना प्रभावशाली घटक आवाज उठवत आहेत. त्यामुळे “सत्य दडपले जात आहे का?” असा सवाल आता उपस्थित होत आहे.

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांकडे सर्वांची नजर
या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे सर्वांच्या अपेक्षा लागल्या आहेत. निष्पक्ष, निर्भीड आणि सखोल तपासासाठी ओळख असलेल्या वाघचौरे यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून सत्य बाहेर आणावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
सखोल चौकशीची गरज तीव्र
या प्रकरणात मानसिक छळ, दबाव, कथित संगनमत आणि आर्थिक तडजोडीचे आरोप समोर येत असल्याने केवळ औपचारिक तपास पुरेसा ठरणार नाही. प्रत्येक पुरावा, प्रत्येक कडी उलगडून तपास केल्यासच खरे सत्य समोर येऊ शकते.

“न्याय मिळेपर्यंत लढा” — नागरिकांचा इशारा
जर या प्रकरणात दोषींवर कारवाई झाली नाही, तर नागरिक आणि सामाजिक संघटना मोठ्या आंदोलनाच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करणे गरजेचे ठरत आहे.
👉 �⁠पुढील भागात:
तपासातील नवे धागेदोरे आणि ‘कॅप्टन खरात’ कनेक्शनचा पुढचा टप्पा उघड!

👉 पुढील भागात:
✔️ सुसाईड नोटमधील संभाव्य धक्कादायक खुलासे
✔️ संबंधित अधिकाऱ्याची भूमिका उघड
✔️ ‘कॅप्टन खरात’च्या जाळ्याचा विस्तार
फक्त दैनिक साई दर्शनवर…

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button