Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
अ.नगरखेळ

weather news:-कडाक्याच्या थंडीमुळे शहर व परिसर गारठला! रात्रीच्या ठिकठिकाणी पेटत आहे शेकोट्या!!

शिर्डी ( प्रतिनिधी) गेल्या दोन-तीन दिवसापासून शिर्डी व परिसरामध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. संपूर्ण वर्षभरामध्ये सर्वात अधिक थंडी सध्या या दिवसात जाणवत आहे. सध्या पडत असलेल्या थंडीचे प्रमाण खूपच अधिक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रस्ते ही रात्री पाऊस पडल्याचे दिसून येतात. ठिक ठिकाणी रात्रीच्या शेकोट्या पेटलेल्या दिसून येत आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे कपाटातील स्वेटर मफलर कान टोप्या असे उबदार कपडे बाहेर निघाले आहेत. तसेच दुकानातही उबदार कपड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


हाडं गोठवणाऱ्या बोचऱ्या थंडीने नागरिक कुडकुडले आहेत. शनिवारी राज्याचे नीचांकी तापमान नोंदवले गेले. असे समजते. दरम्यान उत्तरेकडील थंड हवेच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीसह सकाळी धुक्याची चादर पसरण्याची शक्यता आहे. तापमान घटून पुन्हा काही अंशांनी वाढ होईल. तापमानात पुढील पाच दिवस कोणताही बदल नाही.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या कमी दाबाचा पट्टा हा लक्षद्वीप आणि मालदीवला जोडून असणाऱ्या भागात आहे. चक्रकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपेक्षा 5.8 किमी असल्याने येत्या 24 तासात ही स्थिती पश्चिमेकडे सरकणार आहे. दुसरीकडे उत्तरेकडील राज्यांना थंडीच्या लाटाचा इशारा देण्यात आला आहे .परिणामी महाराष्ट्रात ही कडाक्याची थंडी पडत आहे . उत्तर भारतातून राज्यात शीतलहरी वेगाने येत आहेत, त्यामुळे राज्यातील बहुतांश भाग गारठू लागला आहे.


राज्यात बहुतांश ठिकाणी आकाश निरभ्र असून तापमानात घट होत आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. शिर्डी शहरासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्हात गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे, आगामी पाच दिवस शहराच्या तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान कडाक्याच्या थंडीत नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button