Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
अ.नगरराजकीय

विखे कुटुंबाचे राजकारण हे संपत आलेले आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी राहाता तालुक्यातील अनेक गावातील मतदारांच्या गाठीभेठी घेत आहेत. या वेळी तालुक्यातील अनेक नागरिकांनी सुजय विखे यांच्याकडून बेताल वक्तव्य केले जात असून त्या काहीच तथ्य नसते. परंतु त्यामुळे वातावरण तणावग्रस्त होत असल्याच्या बाबी अनेकांनी घोगरे यांच्या निदर्शात आणून दिल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

kamlakar

घोगरे म्हणाल्या, निवडणुका या आपण केलेल्या पाच वर्षांच्या कामावर तसेच येणार्या काळात काय कामे करणार आहे, या मुद्दांवर होत असतात. परंतु संगमनेर व राहाता तालुक्यातील सभांमध्ये माजी खासदार सुजय विखे हे बेताल वक्तव्य करीत आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्याने तरुणांसह कार्यकर्त्यांमधून रोष व्यक्त केला जात आहे. त्यांनी बेताल वक्तव्य करणे थांबवावे, अन्यथा आम्ही त्यांना जशाच तसे भाषणातून उत्तरे देऊ, असा इशारा घोगरे यांनी दिला आहे.

घोगरे म्हणाल्या की, विखे कुटुंबावर आम्हाला बोलण्याची इच्छाही नाही. पण सुजय विखे यांच्या बेताल वक्तव्यामुळे आम्हाला बोलण्याची वेळ आली आहे. विखे कुटुंबाचे राजकारण हे आता संपत आलेले असून ते संपविण्यासाठी सुजय विखे असल्यानंतर दुसरी कोणाची गरज नाही. सुजय विखेच विखे घराण्याचे राजकारण बेताल वक्तव्याने संविणार आहे. हे सांगण्याची कोणा भविषगाराची गरज नाही, असे घोगरे म्हणाल्या.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button