Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
अ.नगरराजकीय

महावितरणचा अनागोंदी कारभार, ग्राहकांच्या मुळावर सामाजिक कार्यकर्ते शरद तांबे

राहुरी / प्रतिनिधी :  अहिल्यानगर जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कारणही तसेच आहे. वीज माणसांच्या मुलभूत गरजापैकी बनली आहे. मात्र महावितरणचा अनेकदा भोंगळ कारभार नेहमीच दिसला आहे वीजेचे बिल नेहमीप्रमाणे उशीरा येते व ग्राहकांना दंडाचा फटका बसतो आहे. यावर सामाजिक कार्यकर्ते शरद तांबे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


  महावितरणची आधीच उशिरा विज बिले त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहक आणि व्यावसायिकांना वितरित झाले मात्र बिले प्राप्त होताच दुसऱ्याच दिवशी त्यावर अंतिम दिनांक असल्याने विनाकारण ग्राहकांना दंडाचा भुर्दंड दंड भरावा लागत आहे.  
   गत महिन्याची वीज बिले महावितरण कंपनीकडून पाच दिवस उशिरा दिले लागोलग वीज देयकाचा अंतिम दिनांक असल्याने ग्राहकांना हा दंडाचा भुर्दंड नाहक  होताना दिसतोय.

नेहमीच अनेक ‌कारणे आणि जुजबी कारणे दाखवून ग्राहकांना लुबाडणाऱ्या महावितरण  कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या निष्काळजी पणामुळेच हा दंड वीजग्राहकांना विनाकारण भरावा लागत आला आहे. 

या उशीराच्या पाच दिवसांचा हिशेब केला तर यातून दंडाचे लाखो रुपये जमा होतात हा एक प्रकारचा ‌अतिरिक्त ‌चार्ज आहे का? असा प्रश्न प्रवरानगर येथील सामाजिक कार्यकर्ते शरद तांबे यांनी उपस्थित केला आहे. या प्रश्नी महावितरण प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारणार असल्याचे शरद तांबे यांनी सांगितले आहे. 

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button