Letest News
वंदे भारतने मुंबई ते शिर्डी-मुख्यमंत्री फडणवीसांचा साधेपणाचा संदेश राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस साईचरणी नतमस्तक-भक्ती ते शक्ती : शिर्डीत डिफेन्स प्रकल्पाचे भव्य ... “शिर्डीत पेट्रोलसाठी झुंबड! पंपांवर लांबच लांब रांगा=नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन” स्मार्ट ग्राम’चा फक्त गाजावाजा; सावळीविहीरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!”“CCTV बंद स्ट्रीट लाईट गुल-सावळी... “क्लबवर छापे… पण ‘मुख्य सूत्रधार’ अजूनही मोकाट?”“राहात्यात अवैध धंद्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त?” “गर्भलिंग चाचणी रॅकेटचे धागेदोरे निफाडपर्यंत १८ आरोपी जेरबंद ६ डॉक्टर अटकेत!” “शिर्डी-राहात्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ- पिपाडा यांचा अप्रत्यक्ष निशाणा विखेंवर!” “राजकीय वरदहस्तामु... सावळी विहीरमध्ये घरफोडीचा थरार- कडी-कोयंडा तोडून चोरट्यांचा धुमाकूळ ! शिर्डीत भरदिवसा रक्तरंजित थरार- दुकानदारावर जीवघेणा हल्ला कॉकरोच जनता पार्टी”मुळे देशभरात बेरोजगारांचा संताप उफाळला-८ मिलियन तरुण एकवटले! साई संस्थानवर गंभीर...
क्राईमशिर्डी

शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक

शिर्डी : शिर्डी शहरातील साई गणेश गॅस एजन्सीचे  गॅस सिलेंडर वितरणाचा अक्षरशः बोजवारा उडाला असून नागरिक संतापाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. पहाटेपासून महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि कष्टकरी वर्ग गॅससाठी रांगेत उभा राहत असूनही अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचे हाल होत असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


⚠️ काळाबाजाराचा खेळ सुरु? नागरिकांची उघडपणे तक्रार
शहरात गॅसचा नियमित पुरवठा होत नसल्याने घरपोच सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. काही ठिकाणी मागच्या दाराने जादा दराने सिलेंडर विक्री होत असल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहेत. KYC व OTP प्रक्रिया पूर्ण करूनही गॅस मिळत नसल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. घरगुती गॅसचा वापर हॉटेल व व्यावसायिक ठिकाणी होत असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.


🏢 पुरवठा अधिकाऱ्यांना थेट धडक; समीर वीर आक्रमक
या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष समीर वीर यांनी राहाता तालुका पुरवठा अधिकारी खरात यांची थेट भेट घेत तक्रार दाखल केली. नागरिकांची होत असलेली पिळवणूक तात्काळ थांबवावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि गॅस वितरण सुरळीत करावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली.


⏳ 24 तासांचा अल्टिमेटम; अन्यथा तहसीलसमोर आमरण उपोषण
“येत्या 24 तासांत परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार,” असा थेट इशारा समीर वीर यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागले आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button