Letest News
पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ... शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन जिल्हा कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात उत्साहाचा नवा संचार
अ.नगरराजकीय

डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी पावसामुळे प्रभावित भागांची केली तपासणी, नागरिकांना सावधगिरीचा सल्ला

शिर्डी (प्रतिनिधी) :-
काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शिर्डी व राहाता परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक शेतजमिनी, रस्ते, ओढा-नाल्या यांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांसाठी तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

आज डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी परिसरातील प्रभावित भागांची सविस्तर पहाणी केली. राहाता शिर्डी व परिसरातील ओढा-नाल्यांची पाहणी करत त्यांनी अत्यंत मुसळधार पावसामुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणींचा अंदाज घेतला. यावेळी शिवाजी आनप, अनिलभाऊ पिपाडा, नेमीचंद लोढा, महावीर पिपाडा आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

डॉ. पिपाडा यांनी राहाता शहरील छत्रपती व्यापारी संकुल, राहाता साकुरीला जोडणारा पूल, रांजणगाव रोड साई कॉलनी आणि राष्ट्रीय महामार्गलगत शिरकांडे ओढा येथे पाहणी करून परिस्थितीची नोंद घेतली. त्यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन केले.

डॉ. राजेंद्र पिपाडा हे राहाता तालुक्यासाठी नेहमीच लढा देणारे व्यक्तिमत्व आहेत. सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे काम करणारे, हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे.

पावसामुळे प्रभावित नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी तत्परतेने प्रशासनाशी संपर्क साधला आणि तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न केले.

स्थानिक नागरिकांनीही या सेवेला उच्च प्रतिसाद दिला असून, प्रशासनाकडे मदतीसाठी संपर्क साधला आहे. अनेकांचे घर पावसाने नुकसान झाले, रस्ते वाहून गेले, तर शेतजमिनी पाण्यात बुडाल्या आहेत. यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची गरज अधोरेखित होत आहे. डॉ. राजेंद्र पिपाडा

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button