जालन्यात एक भीषण अपघात घडला आहे. सोमवारी (12 मे) मध्यरात्री हृदय पिळून टाकणारी घटना घडली आहे. हैदराबाद येथून शिर्डीकडे जाणाऱ्या खासगी कारला मुरमाने भरलेल्या हायवाने जोराची धडक दिली. यामध्ये पती-पत्नी जागीच मृत्यू झाला आहे, तर इतर पाच जण जखमी झाले आहेत.
हैद्राबाद येथून छत्रपती संभाजीनगर मार्गे शिर्डीला देवदर्शनासाठी जाणाऱ्या कारने उभ्या विरुद्ध दिशेने मुरुमाने भरलेल्या हायवाला जोराची धडक बसली. या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री 11:30 च्या दरम्यान धुळे सोलापूर महामार्गावरील बारसवाडा फाटा येथे घडली.
हा अपघात एवढा भीषण होता की, जेसीबीच्या सहाय्याने गाडी तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आले. हैदराबादहून शिर्डी देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाने घात केला. त्यामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्ती केली जात आहे. या अपघातात जी रामू (वय 45), जी माधुरी (वय 40, दोघेही रा. हैद्राबाद) जागीच मृत्यू झाला आहे.
श्रीवाणी (41), अनुषा (17), मेघना (12), ऋषिका (07), नागेश्वर राव (45) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.