
ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी (8 मे) एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत सरकारी विभागांना आवश्यक वस्तूंचा पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, संपर्क यंत्रणा सुरळीत ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.

लोकांमध्ये भीती पसरू नये, यासाठी उपाययोजना करण्याचेही आदेश देण्यात आले आहे. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दीर्घ काळासाठी तयारी ठेवा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्याशिवाय, आवश्यक वस्तूंच्या किंमतीवर बारीक लक्ष ठेवण्यासही सांगितलं आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींनी सरकारी विभागांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. आवश्यक वस्तूंच्या किंमती वाढू नयेत, यावर लक्ष ठेवा. लोकांनी गरजेपेक्षा जास्त खरेदी करू नये, यासाठी जनजागृती करा. ‘खोट्या बातम्या’ पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.