Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
अ.नगरराजकीय

वाळूमाफीयांची गुंडगिरी गाडून टाकण्यासाठी मला विजयी करा….. डॉ. राजेंद्र पिपाडा.

शिर्डीसारख्या पवित्र भूमीमध्ये राजकीय वरदहस्त लाभलेल्या वाळूमाफियांची गुंडगिरी प्रचंड वाढली असून त्यांना राजकीय अभय मिळाले आहे. वाळूमाफीयांच्या गुंडगिरी आणि दहशती मुळे या परिसरातील सामान्य नागरिक त्रस्त झालेले आहेत. या वाळूमाफियांना कायमचे गाडून टाकण्यासाठी शिर्डी विधानसभा मतदार संघातील सुज्ञ मतदारांनी या निवडणुकीत मला प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


डॉ. राजेंद्र पिपाडा हे अपक्ष म्हणून शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित असून त्यांना आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान मंतदारांशी संपर्क साधतांना अनेक ठिकाणी या भागामध्ये गुंडगिरी करणाऱ्या वाळूतस्करांच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी अनेक मतदारांनी डॉ. राजेंद्र पिपाडा यांना विनंती केली आहे. आपण निवडून आल्याबरोबर या भागातील वाळूमाफियांना कायमचे नेस्तनाबूद करणार आहोत, अशी ग्वाही त्यांनी मतदारांना दिली आहे.


मागील अनेक वर्षे राजकीय सत्ता एकाच कुटुंबाकडे असल्यामुळे त्यांनी अनेक वाळूमाफीया तयार करून आपल्या राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी त्यांचा वापर केलेल्या आहे. गुंडगिरीच्या जोरावर त्यांनी आपले राजकीय साम्राज्य उभे केले आहे. या वाळूमाफीयांच्या जोरावर त्यांचे राजकारण सुरक्षित झालेले आहे. ही प्रवृत्ती संपविणे ही काळाची गरज असून तिच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी आपण माझे हात बळकट करा असे डॉ. पिपाडा यांनी मतदारांना आवाहन केले आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button