Letest News
“द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू
अ.नगरराजकीय

अपघाती मृत्यू झालेल्या दोन ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांचे आर्थिक सहाय्य

अहमदनगर दि.१२- ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा, तसेच कामगार कल्याण विभागांतर्गत विमा योजनेत त्यांचा समावेश करण्याबाबत माहिती घ्यावी,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ऊसतोड कामगारांच्या संदर्भात आयोजित बैठकीत दिले. अपघाती मृत्यू झालेल्या दोन ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांचे आर्थिक सहाय्य देण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.

kamlakar
        बैठकीस मनपा आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे आदी उपस्थित होते.









        अपघाती मृत्यू झालेल्या ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार आणि मुकादम यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. आतापर्यंत १० ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५  लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे









         आज झालेल्या बैठकीत शेतात औषध फवारणी करताना विषारी औषध पोटात गेल्याने मरण पावलेल्या  मंदा कराड आणि मोटारसायकल वरून पडून मृत्युमुखी पडलेल्या मोतीलाल राठोड या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्यास मान्यता देण्यात आली. 







 एक प्रकरण मान्यतेसाठी वरिष्ठ कार्यालयास पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला, तर इतर चार प्रकरणे नैसर्गिक मृत्यू असल्याने नामंजूर करण्यात आली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button