Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
Travel

साई पालखी पदयात्री वाहनांची वावी टोल नाक्यावर अडवणूक..!

sai nirman
जाहिरात

पायी येणाऱ्या साई पदयात्रीच्या वाहनांची सिन्नर शिर्डी महामार्गावर वावी टोल नाक्यावर अडवणूक !
साईभक्तांना मानसिक त्रास !
साई पालखींची वाहने टोल फ्री करावी मागणी!

शिर्डी (प्रतिनिधी) दरवर्षी शिर्डीला साई दर्शनासाठी उत्सवाच्या काळात , दिवाळी सुट्ट्यांमध्ये व इतर वेळी ही नेहमी विविध शहरातून ठिकठिकाणाहुन साईपालख्या व साई पदयात्री मोठ्या संख्येने येत असतात. या साई पालख्या व पदयात्रीबरोबर सामान ठेवण्यासाठी साई भक्तांची वाहने असतात. आतापर्यंत या पायी साई भक्तांच्या, साईपालखीच्या वाहनांकडून कधीही टोल आकारला जात नव्हता. मात्र सिन्नर तालुक्यातील वावी टोलनाक्यावर भिवंडी येथील साई पालखीच्या वाहनांना टोल आकारण्यात आल्याची तक्रार या साई पालखीतील साई भक्तांनी केली आहे. त्यामुळे टोल नाक्यावर पायी येणाऱ्या साई पदयात्रांच्या सामानांची वाहने, साई पालखीची वाहने , आदींकडून शिर्डी कडे येणाऱ्या कोणत्याही महामार्गावर टोल घेऊ नये. अशी मागणी साई पदयात्रींकडून होत आहे.

DN SPORTS

सध्या दिवाळी पाडव्यानंतर अनेक ठिकाणाहून शिर्डीला साई दर्शनासाठी साई पालख्या, साईपदयात्री येत आहेत.साईबाबांच्या दर्शनासाठी थेट मुंबई गुजरात भिवंडी सह वेगवेगळ्या जिल्ह्यातून शिर्डीकडे पदयात्रींची पालखी येत असताना या अगोदर कधीही पालख्यामधील वाहनांना टोलवर करा करताना अडवणूक केली जात नव्हती .केवळ भगवा झेंडा व नाव गाव व बोर्ड बघितला की, सोडून दिले जात होते.व जात आहे.पण वावी येथे भिवंडी वरून शिर्डीकडे १९ वर्षांपासून येणाऱ्या पायी दिंडीची वाहने अडवून पैशासाठी अडवणूक केली जात असल्याचा आरोप भिवंडी येथील साईनाथ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे कार्यकर्ते विकास गिते यांनी केला आहे.
साई पदयात्री पायी दिंडीचे आयोजन करुन शिर्डीकडे येतात. ज्या वाहनात जेवनाचे साहित्य, कपडे झोपण्याचे, कपडे ,पाणी इतर साहित्य काही वाहनात ठेवले जाते. ती वाहने अनेक टोलनाक्यावर मोफत सोडली जातात. पण वावी टोलनाक्यावर अडवणूक केली जात असुन त्यामुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले असा आरोप करुन या टोलनाक्यावर शासनाने कारवाई करावी .व यापुढे साई पालख्या , साई रथ , व साई भक्तांची सामान असणारी वाहने टोलनाक्यावर अडवून त्यांच्याकडून कर वसूल करू नये .अशी मागणी साई पदयात्रेंकडून केली जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button