Letest News
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप... राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप) सुनील निवृत्ती पाटील शिंदे यांचा प्रचंड दावा : “प्रभाग २ मध्ये नंदूभाऊंचा विजय ठरलेलाच… विरोधकांची ब... एआय बनावट वन्यप्राणी व्हिडिओवाल्यांना थेट जेल — एसपी सोमनाथ घार्गे यांची कडक सूचना”
Blog

आळंदीला जाणाऱ्या दिंडीत मृत्यूमुखी पडलेल्या वारकऱ्यांनासाईसंस्थानने मदतीचा हात द्यावा-भारतीय लहुजी सेना

(प्रतिनिधी)- शिर्डी ते आळंदी दिंडी सोहळ्यातील
वारकरी भक्तिमय वातावरणात प्रवास करत असताना रविवारी
या पालखीला संगमनेर तालुक्यातील माऊली घाटाजवळ
अपघात झाला. या अपघातात चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला
तर काही वारकरी जखमी झाले. या मयत झालेल्या वारकऱ्यांना
साईबाबा संस्थानने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी भारतीय
लहुजी सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

महंत काशिकानंद
महाराज, शिर्डी ग्रामस्थ व साईबाबा संस्थानने या पालखीचा
साई पालखी सोहळा असे नामकरण केलेले आहे. महंत
काशिकानंद महाराज यांच्या प्रेरणेतून अनेक वर्षांपासून धार्मिक
ठिकाणी हजारो वारकऱ्यांना बरोबर घेऊन या पालखीतील
वारकरी भाविक धार्मिक दर्शनाचा लाभ घेतात. मात्र अचानक
या पालखीचा अपघात होऊन चार वारकऱ्यांना आपला जीव
गमवावा लागला. त्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले असून
त्या कुटुंबाला शासकीय मदत मिळेलच यात काही शंका नाही
मात्र सदर कुटुंबाला व जखमी झालेल्या कुटुंबातील वारकऱ्यांना
साईबाबा संस्थान त्रिसदस्यीय समितीने मदतीचा हात पुढे
करावा, अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष
मंजाबापू साळवे यांनी साईबाबा संस्थानकडे केली आहे. या
निवेदनावर राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव
हनिफ पठाण, राज्य कार्याध्यक्ष समीर वीर, सुरेश अडागळे,
दगडू साळवे, संतोष भडकवाड, नंदू आरणे, सोपानराव पगारे,
भाऊसाहेब आव्हाड, राष्ट्रीय सरचिटणीस रामभाऊ पिंगळे आदी
पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button