Letest News
मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ... शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन जिल्हा कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात उत्साहाचा नवा संचार शिर्डी शहरातील समाजसेवक आणि साईभक्त जावेद भाई सय्यद यांचे दुःखद निधन शिर्डीच्या भवितव्यावर चिंतनाची गरज-राजकारण बाजूला ठेवून चिंतन बैठक घ्या” — प्रमोद गोंदकर
राजकीय

विठ्ठला.. कार्तिकीसाठी कोण करणार पूजा? पवार की फडणवीस?

मुंबई | ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’ या गाण्यातील ओळींप्रमाणे अशी वेळ प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यावर कधीतरी येतेच. महाराष्ट्रातील विद्यमान राजकीय स्थितत तर नक्कीच. पण, आता ही वेळ चक्क पंढरपुरातील श्री विठ्ठल समितीवर देखील आली आहे. निमित्त ठरले आहे, महाराष्ट्रात तयार झालेली दोन उपमुख्यमंत्री पदं.

sai nirman
जाहिरात

शासकीय नियम आणि संकेतानुसार राज्याचे मुख्यमंत्री आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठल-रखुमाईची शासकीय पूजा करतात. तर उपमुख्यमंत्री हे कार्तिक एकादशी निमित्त पूजा करतात. मात्र, राज्याच्या इतिहासात प्रथमच राज्याला दोन मुख्यमंत्री लाभल्याने आता कार्तिकी एकादशी पूजा कोणाच्या हस्ते करायची? हा पेच मंदिर समितीसमोर उभा ठाकला आहे.

यंदा कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबर रोजी येणार असून याच्या तयारीसाठी काल मंदिर समितीची बैठक झाली . सध्या राज्याच्या राजकारणात रोज नवीन घडामोडी घडत असून सध्या राज्याला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहेत . कार्तिकीच्या पूजेला एकाच उपमुख्यमंत्र्यांनी बोलवावे लागणार असून गेल्या कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली होती. यावर्षी दोन उपमुख्यमंत्री असल्याने नेमके हा मान कोणाला द्यायचा या पेचात मंदिर समिती सापडली असून एकाला बोलावल्यास दुसऱ्याची नाराजी समितीला परवडणारी नाही . या मंदिर समितीची मुदत संपून जवळपास अडीच वर्षे झाली असली तरी अजून नवीन समितीबाबत कोणत्याही हालचाली नसल्याने कोणाची नाराजी नको अशीच सध्याच्या समितीची भूमिका आहे .

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button