Letest News
अबब! साई संस्थान हादरले — संस्थानमधील ४७ कर्मचाऱ्यांनी साईबाबांच्या झोडीत हात घातला”“शेवटी साईबाबांच... पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ...
Blog

जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगता सौरऊर्जा प्रकल्प रद्द व्हावा अन्यथा अमरण उपोषण—- कहार समाज संघटना महाराष्ट्र राज्य

शिर्डी ( प्रतिनिधी)जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प होऊ नये म्हणून मच्छीमार संघटना, ट्रस्ट,पंच सामाजिक संस्था यांच्या वतीने तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले की, संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्यातील पैठण गंगापूर नेवासा शेवगाव या तालुक्यातील पण पसारा परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्प तयार करण्याची पूर्ण तयारी झाली असून वित्तमंत्री व केंद्रीय मंत्री भागवतजी कराड साहेब यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प होताना दिसत आहे त्यामुळे पशु पक्षी, पर्यटन व मच्छिमार तसेच जैविक विविधतेवर मोठा परिणाम होणार असून शासनाने हा प्रकल्प तातडीने रद्द करण्यात यावा यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर निवेदन देण्यात आले आहे. येत्या सात डिसेंबर रोजी नेवासा तहसील कार्यालय व पैठण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सामूहिक मच्छिमार समाज यांच्यावतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे .यासंदर्भात सर्व विभागीय कार्यालयांना निवेदन दिले असून तातडीने प्रकल्प रद्द न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय व पाटबंधारे विभाग कार्यालय दिल्ली येथील प्रधानमंत्री कार्यालय राष्ट्रपती कार्यालय सर्व कार्यालयांना राज्य आणि केंद्रातील सर्व मंत्रालयांना लेखी निवेदन देऊन ‌तसे कळविले असून शासनाच्या व प्रशासनाच्या वतीने तातडीने निर्णय घेण्यात यावे व सात तारखेच्या आत लेखी स्वरूपात संबंधित संस्था ट्रस्ट कमिटी पंच यांच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात यावे, असे न झाल्यास सात तारखेला दुपारी बारा वाजता सामूहिक अमरण उपोषण करणार आहेत यामध्ये अनुचित प्रकार घडल्यास याला शासन प्रशासन सरकार जबाबदार राहील. असे कहार समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button