ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष आणि इस्लाम धर्माचे जाणकार असलेल्या मौलाना मोहम्मद साजिद रशीदी यांनी भारत सरकारकडे अखंड भारत निर्माण करण्याची मागणी केली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चं कौतुकही त्यांनी केलं आहे.
जाहिरात
DN SPORTS
साजिद रशिदी यांनी, पाकिस्तान हा दहशतवादाचं मोठं वृक्ष असून त्याला कापून काढणं आता आवश्यक झालं आहे, असंही म्हटलं आहे.
अखंड भारत हवा
“आम्ही आपल्या सरकारला सांगू इच्छितो की पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन संपवून टाका. पाकिस्तान नावाचा हा वृक्षच कापून टाकला तर सर्व राज्य भारताच्या ताब्यात येतील. आम्हाला अखंड भारत हवा आहे. जसा आधी होता तसाच भारत आम्हाला हवा आहे,” असं साजिद रशिदी म्हणाले.