
रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. या वक्यव्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यात लोक रस्त्यावर उतरले होते. यावेळी आंदोलकांनी रामगिरी महाराज यांच्या अटकेची मागणी केली होती. तसेच काही ठिकाणी दगडफेकीच्या घटनाही घडल्या होत्या. या सगळ्या घटनेबाबत बोलताना महायुती सरकारमधील आमदार अमोल मिटकरींनी त्यांच्यावर टीका करत कारवाईची मागणी केली आहे.बांग्लादेशमध्ये जे अत्याचार सुरू आहेत त्याचं कोणी समर्थन करत नाही. पण बांग्लादेशच्या अत्याचाराचा आणि भारताचा संबंध काय? कोण भारतातील वातावरण खराब करतंय.. कोणत्या मुसलमानाने हिंदू धर्माबाबत अपशब्द काढले आहेत? किंवा कोणत्या हिंदूने मुस्लिमांबाबत अपशब्द काढलेत.’आपण हिंदू धर्माचं तत्वज्ञान सांगत असताना.. हिंदू धर्मातील चांगल्या गोष्टी सांगा ना.. अशा पद्धतीने हजरत मोहम्मद पैंगबर.. जे इस्लाम धर्माचं श्रद्धास्थान आहे त्यांच्याबाबत एवढ्या अश्लील भाषेत बोलताना या महाराजांना जराशी लाज वाटली नाही का?’ अशा लोकांवर कायदेशीर वचक असला पाहिजे. कुठल्याही धर्माची विटंबना करताना.. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो हे या लोकांना माहीत असताना.. असे प्रकार करणं म्हणजे संन्यासाच्या वेषात गुंडागर्दी करण्याचा प्रकार आहे.’ तुकडोजी महाराजांच्या महाराष्ट्रात असे लफंगे महाराज (रामगिरी महाराज) जन्माला येणं.. मला असं वाटतं की, हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे. स्वत: नाव रामगिरी ठेवताना यांना जरा जरी भान का राहिलं नाही?’ जे वक्तव्य केलं ते निंदनीय आहे. मी तर उलट म्हणेन की, अशा व्यक्तीची पाठराखण करू नये. देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली याला तात्काळ अटक करावी. जर एखाद्या धर्माबाबत बोलून दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण होत असेल तर या दंगलखोरीचं मूळ.. जसं मालेगावच्या दंगलखोरीचं मूळ होतं.. तसं या दंगलखोरीचं मूळ हा महाराज आहे का? अशा व्यक्तीवर ताबडतोब कारवाई केली पाहिजे.’ अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी रामगिरी महाराज यांच्यावर टीका केली आहे.