Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
क्राईमशिर्डी

शिर्डी जवळील काकडी विमानतळा जवळ दोघे ठार! हा दरोडा की खून शिर्डीसह पंचक्रोशीत चर्चा! 

कोपरगाव तालुक्यातील दक्षिणेस साधारण ३० कि.मी.अंतरावर असलेल्या काकडी (शिर्डी) विमानतळाला लागून दक्षिण बाजूस असलेल्या (मूळ संवत्सर येथील रहिवासी असलेल्या) भोसले वस्तीवर रात्री अज्ञात इसमांनी कुऱ्हाडीने (!) केलेल्या हल्ल्यात मुलगा कृष्णा साहेबराव भोसले (वय ३२) हे जागीच त्यांचे वडील साहेबराव पोपट भोसले (वय ६०) हे दोघे ठार झाले आहे तर साखरबाई साहेबराव भोसले (वय-५५)(आई) ही गंभीर जखमी झाली आहे





































































तर-त्यांची सासू गजुबाई मारुती दिघे (वय ७०) या मात्र या हाणामारी पासून संशयास्पदरित्या बचावल्या आहेत.घटनास्थळी श्वान पथक घेत आहे.या घटनेने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.



























कोपरगाव तालुक्यातील गुन्हेगारीचा आलेख सारखा वाढत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने वारंवार अधोरेखित केले आहे.मात्र पोलिस यावर काहीही कारवाई करत असताना दिसत नाही परिणामी गुन्हेगारांचे फावत असल्याचे वारंवार उघड होत आहे.गावठी कट्टे तर भाजीपाला मिळावा असे मिळत असून त्यात वाळू चोरांचा मोठा वाटा असल्याचे दिसून येत आहे.यात महसूल आणि पोलिसांत घुसलेला भ्रष्टाचार याने व्यवस्था पुरती पोखरून काढली असल्याचे दिसत आहे.




































त्यामुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे दिसून येत आहे.त्याचे रूपांतर आता टोळी युद्धसदृश स्थितीत होताना दिसत आहे.अशीच घटना रात्रीच्या सुमारास काकडी विमानतळाच्या दक्षिणेस हाकेच्या अंतरावर घडली आहे.मात्र ही घटना सकाळी दिघे वस्तीवर रोज दूध काढण्यासाठी होणारी कोणतीही हालचाल दिसली नाही.शिवाय सकाळी दूध घालण्यासाठी गावात जाण्यासाठी कोणीही घराबाहेर पडले नाही म्हणून शेजारी वस्तीवाल्या शेजाऱ्यांना संशय आला त्यावरून या घटनेचा भांडाफोड झाला आहे.











































दरम्यान त्या ठिकाणी असलेल्या काही कर्तव्यदक्ष असलेल्या नागरिकांनी ही बाब राहाता पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांचे दूरध्वनी वरून लक्षात आणून दिली होती.त्यावेळी सावध झालेल्या शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमणे यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली होती.त्यावेळी घटनास्थळी मुलगा कृष्णा साहेबराव भोसले (वय ३२) हे जागीच ठार झाले असल्याचे दिसून आले आहे,




































तर त्यांचे वडील साहेबराव पोपट भोसले (वय ६०) हे गंभीर जखमी झाले असल्याचे दिसून आले होते.त्यांना तातडीने उपचारार्थ शिर्डी येथील रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.तर साखरबाई साहेबराव भोसले (वय-५५)(आई) ही गंभीर जखमी झाली आहे त्या अद्याप कोमात असल्याची माहिती मिळाली आहे.तर त्यांची सासू गजुबाई मारुती दिघे (वय ७०) या मात्र या हाणामारी पासून संशयास्पदरित्या बचावल्या आहेत.












































घटनास्थळी श्वान पथक घेत आहे.या घटनेने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.घटनास्थळाची पोलिसांनी नाकेबंदी केली असून वस्तीला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.
























दरम्यान यातील एका माहिती नुसार सदर ठिकाणी हे कुटुंब संवत्सर येथून आले त्याला कारण तेथील दिघे कुटुंबातील मयतांची सासू गजुबाई दिघे यांना तीन मुले होती.त्यातील एका मुलाचे आकस्मित निधन झाले होते.त्यानंतर अल्पावधीत त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते.

























या आपत्यास एक मुलगी होती.मात्र तिला हिस्सा द्यायला नको म्हणून उर्वरित दोन भावांनी सदर जमिनीपैकी सहा एकर जमीन ही संवत्सर येथील आपल्या मुलीस म्हणजेच जखमी साखरबाई साहेबराव भोसले यांच्या नावावर अल्प काळासाठी परत भावांच्या नावावर करून देण्याच्या बोलीने दिली होती.मात्र पुढे जाऊन सदर जमीन भोसले कुटुंब म्हणजेच साखरबाई भोसले आपल्या दोन भावांच्या म्हणजेच दिघे बंधूंच्या नावावर करून देत नव्हती.




















त्यातून वाद उद्भवले होते.त्यातून त्यांची वारंवार भांडणे होत होती.त्यामुळे ही हत्या त्यांनी घडवून आणली असावी शक्यता व्यक्त होत आहे.मात्र ती शक्यता फार कमी असल्याचे तर दुसऱ्या माहितीनुसार यातील मयत इसम साहेबराव भोसले यांचे संवत्सर येथे असताना एक गंभीर गुन्हा दाखल झालेला होता.त्यातून त्यांना कारागृहाची वारी घडली होती मग त्या जुन्या गुन्ह्यातून हे हत्याकांड घडले का ?





























याबाबत काकडी आणि परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.तर तिसऱ्या शक्यतेनुसार हा गुन्हा चोरट्यांनी चोरी करण्याच्या इराद्याने गुन्हा केला असल्याची शक्यता असून आपले नाव उघड होऊ नये यासाठी ही हत्या केली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मात्र वृध्द महिला अंध असल्याने तिला त्यांनी सोडून दिले असावे असे दिसते.यातील तिसरी शक्यता जास्त दिसत असल्याची माहिती आहे.






































दरम्यान उशिरा मिळालेल्या माहितीनुसार राहाता पोलिसांनी घटनास्थळी जावून तेथील लोकेशन वरून झालेले फोनची माहिती घेऊन व आरोपींनी पळवलेल्या दुचाकीवरून आरोपींचा शोध घेतला असून त्यांच्या सिन्नर तालुक्यातून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असल्याचे समजत आहे.त्यांना सिन्नर वरून लोणी पोलिस ठाण्यात आणले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.दरम्यान याबाबत पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही त्यामुळे याबाबत विविध तर्ककुतर्क व्यक्त होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button