Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
क्राईमशिर्डी

शिर्डीतील आर्थिक घोटाळा प्रकरणा संदर्भात वृत्त येताच मोठी खळबळ!  अदृश्य झालेला मुख्य सूत्रधार अचानक झाला प्रगट 

शिर्डी (प्रतिनिधी) आजच्या धकाधकीच्या व डिजिटल युगामध्ये वेगवेगळ्या मार्गाने आर्थिक फसवणुकीचे प्रकार सातत्याने वाढत असून नवनवीन पद्धती शोधून लोकांना ‌मोठी आमिषे दाखवून आपल्या जाळ्यात अडकून आर्थिक फसवणूक करत घरबसल्या कोट्यवधी रुपये कमावले जात आहे. असे प्रकार राज्यात ,देशात उघडकीस येत असून शिर्डीतही असा प्रकार घडल्याची मोठी चर्चा आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

व कोट्यावधी रुपयांचा घोटाळा एका बोगस शेअर्स मार्केट स्कीम प्लॅन मध्ये झाल्याची शिर्डी व परिसरात मोठी सध्या चर्चा सुरू आहे. हळूहळू आता गुंतवणूकदाराही या संदर्भात दबक्या आवाजात बोलू लागले आहेत. शिर्डी मध्ये एका ट्रेडिंग कं.नावाने येथिलच एका प्रतिष्ठित संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तीच्या मुलाने येथे ही ट्रेडिंग कंपनी सुरू करून आपल्या समवेत दोन चुलत भाऊ व एक मित्राला एजंट

नेमून शिर्डीतील प्रतिष्ठित संस्थेत काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला वेगवेगळ्या प्रकारचे आमिषे दाखवून मोठ्या प्रमाणात पैसा गोळा करण्याचा व्यवसाय चार-पाच वर्षांपूर्वी सुरू केला होता. या कंपनीचे मालकाचे वडीलही शिर्डीतील प्रतिष्ठित संस्थेत नोकरीला असतानाही त्यांनी आपल्या संस्थेतील अनेक कर्मचाऱ्यांना या ट्रेडिंग कंपनीत जादा परतावा देण्यात येईल असे आमिषे दाखवून मोठी गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. मात्र तेही आता शांत झाले आहेत.

दैनिक साई दर्शन ने पोर्टलवर या संदर्भात गुंतवणूकदारांची टक्के आवाजातील चर्चा वृत्ताद्वारे प्रसिद्ध केली. त्यामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडावा म्हणून भावनात्मक आवाहन करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला.त्यामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे घेतल्याचे मान्य केल्याचे दिसते. चार ते पाच वर्षांपूर्वी ही ट्रेडिंग कंपनी येथे सुरू झाली . शेअर्स मार्केट मध्ये पैसे गुंतवतो असे सांगत गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करत काही दिवस चांगल्या व्याजाने परतावा या ट्रेडिंग कंपनी द्वारे गुंतवणूकदारांना देण्यात आला. त्यामुळे त्यांचा व इतर लोकांचा विश्वास बसला.

फेस टू फेस जाहिरात केली गेली. हळूहळू त्यामुळे गुंतवणूकदार वाढत गेले. नंतर या कंपनीने एक लाख रुपयाची मर्यादा तीन लाख रुपये केली. त्यासाठी दोन प्रकारचे वेगवेगळे स्कीम प्लॅन अंमलांत आणले. एक प्लॅन बारा महिन्यासाठी तर एक प्लॅन आठ महिन्यासाठी होता. तसे गुंतवणूकदारांच्या मोबाईल ग्रुप वरही टाकण्यात आले होते. कंपनी मोबाईल नंबर वरून एक जानेवारी 2025 पासून ची नवीन गुंतवणूक प्लॅन व त्याची नियमावली ग्रुप वर टाकण्यात आली होती .त्यामध्ये म्हटले होते की, एका महिन्यात एका पॅन कार्ड वर एकदाच इंट्री होऊ शकते.

कुठल्याही प्लानमध्ये गुंतवणूक करा परंतु एका पॅन कार्डवर एका महिन्यात एकदाच गुंतवणूक ग्राह्य असणार आहे. फोन पे, गुगल पे अन्य कुठल्याही युपीआय अपवर पैसे स्वीकारले जाणार नाहीत. कूलिंग पिरेड हा गुंतवणूक पिरेड + पाच दिवस असा असेल.आदी नियमही गुंतवणूकदारांसाठी देण्यात आले होते. अनेक गुंतवणूकदारांनी एक लाखाच्या ऐवजी तीन लाख रुपये गुंतवणूक मर्यादा झाल्यामुळे घरातील सोने चांदीचे दागिने विकून, शेती विकून, जनावरे विकून ,वाहने विकून ,पैसे नातेवाईकांकडून आणून गोळा केले

व या कंपनीत गुंतवले. ज्यादा परतावा मिळतो म्हणून अनेकांनी हा खटाटोप केला. मात्र कंपनी मालक व एजंट मालामाल झाले. कोट्यावधी रुपये गोळा होत गेले. हळूहळू गुंतवणूकदारांची साखळी वाढत चालली तशी गुंतवणुकीची रक्कमही वाढत गेली. या कंपनीचा मालक याने तर आपला साखरपुडा नाशिक येथे मोठ्या राजासारखा केला. एवढेच नव्हे तर एका शोरूम दुकानाचे शटर पैशाच्या जीवावर रात्री उघडायला लावून दोन कोटीची कार खरेदी केली. अशी गुंतवणूकदारांमध्ये चर्चाही आहे. कंपनी व आपण मोठे श्रीमंत असून कोणाचेही पैसे बुडणार नाहीत

असा गुंतवणूकदारांपुढे त्यामुळे आभास निर्माण करण्यात आला. अनेक जण या वरवर श्रीमंतीच्या देखाव्याला फसले. व अनेकांनी आपली रक्कम गुंतवली. अनेकांना प्रथम परतावा मिळाला मात्र नंतर हळूहळू परतावा मिळण्यास किंवा मुद्दल वरील व्याजही मिळण्यास विलंब होऊ लागला. नंतर मुद्दल वरील व्याज मिळणे दुरच पण मुद्दलही लवकर मिळेलच अशी खत्री राहिली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना हळूहळू शंका वाटत चालली. दबक्या आवाजात गुंतवणूकदारांमध्ये तशी चर्चा होऊ लागली.

मग या कंपनीचा मालक व एजंट यांच्याकडे आमचा परतावा तसेच मुद्दल आमची आमची परत मिळावी म्हणून मागणी होऊ लागली. मात्र कंपनीचा मालक अनेकांच्या या तगाद्यामुळे आजारी पडला की बहना केला. की तो फरार झाला. त्याचा मोबाईलही बंद व कार्यालय ही बंद अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली असून एजंट यांनीही कानावर हात लावले आहेत.

एजंटही फोन उचलत नाहीत. उचलले तर थातूरमातूर उत्तर देऊन टाळाटाळ करतात. हेच एजंट ग्रो मोर कंपनी कशी स्टॅंडर्ड आहे, कसा परतावा आपल्याला मिळतो हे सांगत फिरत होते. आता मात्र गुंतवणूकदारांचे पैसे परतावासह मुद्दल मिळवून देण्यासाठी टाळाटाळ सुरू आहे. अनेकदा तर ज्यादा तगादा लावला तर आपल्या नावाने चिठ्ठी लिहून आम्ही जिवाचे काही बरे वाईट करतो अशी धमकीही गुंतवणूकदारांना मालक व एजंटांकडून दिली जात आहे .

या कंपनीने दोन महिन्यापूर्वी पाच महिन्याचा अवधी गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याचा दिला होता .त्यापैकी दोन महिने संपले आहेत. तीन महिने बाकी आहेत. मात्र मालक सध्या गायब आहे. त्यामुळे तीन महिन्यातही पैसे मिळतात की नाही असे टेन्शन गुंतवणूकदारांना वाढले आहे. दर महिन्याला मिळणारा परतावा मिळत नाही. मुद्दलही गुतली आहे .त्यामुळे दर महिन्याला घरातील किराणा सामान, घरगुती खर्च भागवणे अनेकांना मुश्किल होत आहे.

अनेकांनी सोसायटी, बँकांकडून कर्ज घेऊन या कंपनीत आपली रक्कम गुंतवणूक केली . मात्र परतावा महिन्याला मिळत नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. बँका तोंडी सांगून ऐकत नाहीत. मात्र या कंपनीच्या मालकाला ,एजंटला काही घेणे देणे नाही. त्यामुळे गुंतवणूकदार मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून जीवाचे काही बरे वाईट करण्याअगोदर या कंपनीचा छडा लावणे गरजेचे आहे.

जर दर महिन्याला परतावा किंवा मुद्दल मागूनही मिळत नसेल तर गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रार केली पाहिजे. राज्यात, देशात अनेक आर्थिक घोटाळा उघडकीस आणणाऱ्या शासकीय संस्था आहेत. जरी गुंतवणूकदार आपल्या इज्जती पोटी किंवा काही कारणास्तव उघड तक्रार देत नसतील तरी या संस्थांनी पुढाकार घेऊन या कंपनीची चौकशी केली पाहिजे. या कंपनीचे अकाउंट तपासून सील केले पाहिजे. त्यांची मालमत्ता सील केली पाहिजे व गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे ,मिळाले पाहिजेत. अनेकांकडे पैसे भरल्याचे स्क्रीन शॉट आहेत पुरावे आहेत. ते गृहीत धरून अशा शासकीय चौकशी कंपन्यांनी गुंतवणूकदारांना अशा परिस्थितीत सहकार्य करावे. अशी मागणी गुंतवणूकदारांकडून जोर धरू लागली आहे. कारण ज्या ट्रेडिंग कंपनीमध्ये गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली आहे त्या ट्रेडिंगचा मालक या गुंतवणूकदारांच्या दबक्या आवाजातील चर्चेमुळे व वृत्तामुळे अचानक बिळातून बाहेर आल्यासारखा आता कुठेतरी बसून व्हिडिओद्वारे गुंतवणूकदारांना फसवणार नाही अशी भाषा बोलू लागला आहे. मात्र जय गुंतवणूकदारांचे पैसे घेतले ते कुठे गुंतवले बँकेपेक्षा जादा परतावा कसा दिला जातो .

गुंतवणूकदारांची मुद्दल व परतावा ठरल्याप्रमाणे देणार की नाही व तो कधी देणार यासंदर्भात व्हिडिओद्वारे जाहीर करणे महत्त्वाचे आहे. उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत गुंतवणूकदारांना ठेवून वेळ काढत राहणार हा पर्याय नाही. कारण गुंतवणूकदार आता मेटाकुटीला आले आहेत. अनेक गुंतवणूकदारांच्या झोपा उडाले आहेत.अशी प्रकरणे शेवगाव, कोल्हापूर मध्ये उघडकीस आली असून गुन्हे दाखल झाले आहेत.

काही अटक झाली आहे. त्यामुळे येथेही गुंतवणूकदारांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे शेवगाव कोल्हापूर प्रमाणे येथेही या कंपनीकडून हा प्रकार होतो की काय ही शंका गुंतवणूकदारांना आहे तशी दबक्या आवाजात येथे चर्चा आहे. गुंतवणूकदार खाजगीत बोलत आहेत. मात्र गुंतवणूकदारांना भावनात्मक व्हिडिओद्वारे आवाहान करून आता चालणार नसून अनेक ठिकाणी घडलेल्या प्रकरणामुळे शिर्डी त असा प्रकार होऊ नये व सर्वांचे मुद्दलपैसे हे वेळेत व परताव्यासह मिळावेत हीच सर्व गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे.

नाहीतर शेवगाव कोल्हापूर प्रमाणे गुंतवणूकदारही आपल्या न्यायासाठी कायदेशीर लढाईस सज्ज आहे. असे गुंतवणूकदारांमधून धक्क्या आवाजात बोलले जात आहे. दैनिक साई दर्शनच्या बातमीमध्ये हीच‌ सत्य उघड करण्याची शक्ती आहे. म्हणून ज्यांनी आपले कष्टाचे पैशे ह्या स्कीम मध्ये लावलेले आहेत त्यांनी पुढे यावे. काल एक बातमी प्रकाशित केल्या नंतर आज दिवस भरात 9 लोकांनी आमच्याकडे पुराव्या सहित व्यथा मांडल्या आणि जसे पाप्या शेख च्या वेळेस दैनिक साई दर्शन ने प्रण घेऊन प्रकरण तडीस नेले .

त्याच प्रकारे हेही प्रकरण तडीस नेण्याचे दैनिक साई दर्शन ने प्रण घेतले आहे. सत्य उजेडात आणणे हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभ असणाऱ्या वृत्तपत्राचे काम आहे. व ते आपण करत आहोत. म्हणूनच येथील या ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची समस्या,दबक्या आवाजातील चर्चा संदर्भात वृत्त प्रसिद्ध या वृत्तामुळे मोठी खळबळ उडाली आणि मग फोन न उचलणारे नंतर का होईना बाजू सावरण्यासाठी कुठेतरी राहून व्हिडिओद्वारे,प्रगट होऊन बोलू लागले लागले.

मात्र मुद्द्याचं जे बोललं पाहिजे ते सोडून पळवटात जास्त शोधण्याचा प्रयत्न या कंपनी कडून होत असल्याचे सध्यातरी अनेक गुंतवणूकदारांच्या म्हणण्यानुसार दिसून येत आहे.तेव्हा कोणाच्या हि भूल थापांना बळी न पडता अन्याय ग्रस्तांनी पुढे यावे. जसे शेवगाव कोल्हापूर मध्ये झाले. तरच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल असेही आता अनेक गुंतवणूकदार व त्यांचे नातेवाईक यांच्या मधून सध्या जोरदार चर्चा खाजगीत सुरू आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button