
नगर प्रतिनिधी / शिर्डी विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात मतदार संघात मोठी नाराजी व रोष असल्याने मतदार निवडुन देणार नाहीत असा जनतेचा सुर आहे. त्यामुळे भी विधानसभा निवडणुक लढवावी असा राहाता तालुक्यातील लोकांची इच्छा आहे. जनतेच्या इच्छेला प्रतिसाद देत आपण शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढविण्यास इच्छुक आहोत, उमेदवार बदलला तर जागा वाचेल त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी मी वरिष्ठ नेत्यांकडे करणार आहे. वर्षांनुवर्षे सर्व सत्ताकेंद्रे एकाच कुटुंबात असल्याने जनतेमध्ये नाराजी आहे. यापूर्वी विधानसभा निवडनुकीत कडवी झुंज देऊन ११ फेऱ्यांपर्यंत १३ हजार मतांनी पुढे होती. विजयाच्या जवळ पोहोचलो होतो. त्यानंतरच्या निवडणुकीत मी वरिष्ठांध्या आदेशानुसार पक्षशिस्त पाळली. है लक्षात घेऊन येथून उमेदवारी मिळावी अशी मागणी वरिष्ठ नेत्यांना भेटुन करणार आहोत,
अशी माहिती भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी पत्रकाराना दिली. डॉ. राजेंद्र पिपाडा म्हणाले की, शिर्डी विधानसभा मतदारसंघात विरोधकांना खालच्या पातळीवर जाऊन त्रास दिला जातो.
अॅट्रॉसिटीचा खोटा मुन्हा विरोधकांमार्फत दाखल केला होता. आमच्यावर जीवघेणे हल्लेही झाले होते. मात्र आपण या दडपशाहीस पुरून उरलो आहोत विरोधकांवर हल्ले केले जातात, काहींवर तर हल्ले करून त्याचे हात पाय मोडल्याच्या घटना यावर्षी घडल्या आहेत जो विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असतो. त्याच्या विरोधात आपल्या बगलबच्च्यांना पत्रके काढायला लावली जातात. विरोधात उमा राहिलेला उमेदवार मॅनेज आहे अशी चर्चा करून बदनामी केली जाते. सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की राजेंद्र पिपाड़ा कधीही मॅनेज झाले नाही आणि होणारही नाही, विरोधकांवर अॅट्रॉसिटी व विनयभंगासारखे खोटे गुन्हे दाखल केले जातात, मी
न पाहिलेल्या जिल्ह्याबाहेरील माणसाने माझ्यावर गुन्हे दाखल केले त्यामागे कोण आहे
जनतेला माहीत आहे दहशत आणि दडपणाही सुरु आहे. विरोधकांची अडवणुक करण्याचे आणि जिरवाजीरवीचे राजकारण करण्यात धन्यता मानली जात आहे.शिर्डी विधानसभा मतदारसंघात विकासाचे प्रक्ष वर्षानुवर्षे प्रलंबीत आहेत. गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. ही परिस्थिती आपण बदलू शकते, हे राहाता पालिकेच्या माध्यमातून आपण दाखवून दिले. मोडकळीला आलेले गोदावरी कालये, खड्डयात गेलेला शिर्डी नगर रस्ता आणि ५५ वर्ष होऊनही निळवंडे कालव्याचे पाणी अजूनही शेतकऱ्यांच्या शेतात गेले नाही. हा महत्वाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहेत. त्या पूर्ण करण्याची इच्छाशक्ती दाखविली जात नाही. साईसंस्थानच्या माध्यमातून रोजगार निर्मीतीला व अर्थकारण वाढेल लोकाचे जीवनमान व रहिवास श्रेत्र वाढेल यादृष्टीने चालना देणारे प्रकल्प राबविले जात नाहीत हे जनतेच्या लक्षात आले आहे रोजगाराची साधने नसल्याने तरुण बेरोजगार आहेत, शेतीला पाणी नसल्याने सामान्य शेतकरी आणि विकास नसल्याने जनता भरडली जात आहे.
आपण स्वतः शेतकरी असल्याने शेतक-यांचे प्रश्न संवेदना आपल्याला समजतात. साईमंदिराचे चार दरवाजे सामान्य भाविकांसाठी का खुले केले जात नाहीत. असे अनेक प्रश्न सामान्य जनतेला पहले आहेत. गोदावरी कालव्यातून शेतकयांना वेळेवर पाणी मिळत नाहीत, साईसंस्थान ५९८ कंत्राटी कामगाराचा प्रश्न प्रलंबीत आहे मंत्री असताना सोडवता आला नाही , शिर्डी व परिसरात होणाऱ्या चोरी व शिर्डी मतदारसंघात असलेली गुन्हेगारी व गुन्हेगारांना मिळणारे राजकीय पाठबळ वेश्या व्यवसायाचा झालेला सुळसुळाट धुमस्टाईल चोरी असे एक ना अनेक प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबीत आहेत. हे प्रश्न आपण मार्गी लावू शकतो असा जनतेला विश्वास आहे.यापूर्वी आपण या शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. मोठी झुंज दिली आणि विजयाच्या जवळ जाऊन पोहोचलो होतो. आपला, थोड्या मतांनी पराभव झाला. या पराभवानंतर देखील आपण जनते सोबतचा संपर्क कायम ठेवला. राहाता शहरवासीयांनी आपण केलेल्या कामाची पावती म्हणून पालिकेत २ वेळा नोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणुन पत्नी ममता पिपाडा बांना राहात्याच्या जनतेने निवडुन दिले. आमच्या काळात सर्वसामान्य लोकांना सन्मानाने वागणुक दिली त्यांची विकासकामे करण्याचा प्रयत्न आम्ही कला.
एक मॉडल म्हणून राहाता शहराचा विकास कला. विरभद्र मंदिरासमोरी अतिक्रमणे काढून बाजारतळाचे काँक्रीटीकरण केले. राज्यातील एक स्वच्छ, सुंदर व अद्ययावत स्मशानभुमी विकसित कली. राहाता शहराची पाणीपुरवठा योजना जवळपास पूर्ण केली. वाड्या वस्त्यावरील रस्त्यांची कामे केली. साई संस्थानच्या ५९८ कामगारांचा प्रश्नासाठी गेल्या २ वर्षापासुन आम्ही प्रयत्न करीत असून हा प्रश्न लवकरच सुटेल अशी आशा आहे.
साई संस्थानच्या वतीने अद्ययावत कॅन्सर उपचार रुग्णालय तसेच बर्निंग वॉर्ड सुरू व्हावा बासाठी आपण पाठपूरावा करीत आहोत. नाईसंस्थानच्या वतीने गोर गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मेडीकल व इंजिनियरींग कॉलेज झाले पाहिजे यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. शिर्डीत गुन्हेगारांना धाक राहीलेला नाही टोळ्या वाढल्या आहेत .भाविकांच्या गळ्यातील दागीन्यांची राजरोस चोरी होते. दुचाकी आणि चारचाकी वाहने चोरीला जातात. वाहतुक पोलीस भाविकांच्या गाड्या अडवून त्यांना अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी करतात. संपुर्ण भारतातुन साईभक्त हे शिर्डीत येत असतात परंतु महामार्ग वाहतुक पोलिसांकडुन परराज्यातील वाहनांची अडवणुक करुन त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी केली जाते. हे कुणाच्या आशिर्वादाने सुरू आहे हे सामान्य जनतेला ठाऊक आहे.
प्रस्थापितांमार्फत गुन्हेगारीला शिर्डी मतदार संघात प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे जनतेच्या मनात संतापाची भावना निर्माण झाली आहे. काही जणांनी साईबाबा संस्थानच्या मंदिर परिसराचे दरवाजे २ वर्षापासुन बंद ठेवायला भाग पाडले. आपले सरकार असतानाही ग्रामस्थांना आंदोलन करावे लागते हे योग्य आहे का? यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते याला जबाबदार कोण? साई मंदिरातील फुल हार प्रसाद बंद करायला त्यांनीच सांगायचे आणि समिती नेमायला देखील त्यांनीच आदेश द्यायचे. ही दुटप्पी भूमिका शेतकरी व फुल विक्रेत्यांच्या लक्षात आली आहे. गुलाबाची व इतर फुल उत्पादक शेतकरी आणि दुकानदार व छोटे विक्रेते हैराण झाले आहेत.
आपण सामान्य जनतेची कामे करण्यासाठी सदैव तत्पर असतो. त्यामुळे आपण स्पर्धेत आहोत. हक्काचा माणूस आपल्या हक्का साठी हे घोषवाक्य प्रत्यक्षात आणीत आहोत. जनतेच्या मनातील उमेदवार या नात्याने येत्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी वरिष्ठ नेत्यांना भेटुन मागणार आहोत, अशी माहिती डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी दिली.