आज कोपरगाव शहरात श्री.सतीश शेठ कृष्णाणी यांचे नाव मोठे आदाराने घेतले जाते. फाळणीनंतर ते 1966 साली कोपरगाव आले,खंदक नाला परिसरात एका टेबलावर ऑटो स्पेअर सुरू केले. त्यानंतर रनवेल बॅटरी या नावाने व्यवसायत पर्दापण केले. त्या काळात स्व.मुरलीधर भाऊ लोणारी यांचे महाराष्ट्र गॅरेज कोपरगाव पंचक्रोशीत प्रसिद्ध होते.
माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे यांच्या आशीर्वादाने श्री.सतीशशेठ कृष्णाणी यांना गॅरेजचे मोठे काम मिळायचे, त्या काळात स्व.शंकररावजी काळे व स्व.शंकरावजी कोल्हे यांचे चैन ट्रॅक्टर व रशियन ट्रॅक्टर व बॅटरी चे काम आवर्जून श्री.सतीश शेठ कृष्णांनी यांना मिळायचे याचा मोठ्या आदाराने उल्लेख करतात.
पुढे त्यांनी सप्तर्षी माळा येथे भारत स्कुटर ची स्थापना केली तेथून पुढे त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
1980 साली प्रथम भाजपा सदस्य 1995 ते 2001 साली महायुतीचे सरकार असताना ते भाजपचे शहर अध्यक्ष झाले.
1995 साली स्व.शंकररावजी काळे यांच्या आशीर्वादाने गौतम बँकेत 20 वर्षे संचालक 4 वर्ष चेअरमन 10 वर्षे व्हाईस चेअरमन राहिले बँकिंग क्षेत्रात यांचा दांडगा अनुभव आहे.
स्व.शंकरावजी काळे स्व.शंकरावजी कोल्हे स्व.सूर्यभानजी वहाडणे यांचा आलेला निकटचा संबंध व त्यांचे आशीर्वाद व सहकार्य आजपर्यंत मी येथे पोहोचलो याचा आवर्जून उल्लेख करतात.
कोपरगाव सिंधी समाजाची त्यांनी स्थापना केली. सिंधी समाजाचे चारीटेबल ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष आहे
कोपरगाव सिंधी समाजाच्या गणेशोत्सव मंडळामार्फत त्यांनी अनेक समाज सेवा केली. कोपरगाव येथील आनंद नगर भागात श्री.झुलेलाल व गणेश मंदिर बनवण्यामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे.
लवकरच हे मंदिर पूर्ण होईल, आज सतीशशेठ कृष्णाणी परिवाराने भारत स्कूटर, साईनाथ सायकल, गुरु स्पेअर हाऊस,गुरु डिजिटल,माय फोन,श्री.डेंटल क्लिनिक या विविध प्रतिष्ठान द्वारे आज कोपरगावकरांची सेवा करीत आहे.
अशा या श्री.सतीश शेठ कृष्णाणी सर्व गुण संपन्न व्यक्तीस “जीवन गौरव पुरस्कार” मिळाल्यामुळे व्यापारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.पुन्च्छ एकदा हार्दिक अभिनंदन….!