Letest News
पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ... शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन जिल्हा कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात उत्साहाचा नवा संचार
Blog

निळवंडे धरणातून पाणी आवर्तन सुरूच राहणार मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन! खा. सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांचा प्रश्न लावला मार्ग!

शिर्डी (प्रतिनिधी) नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या व
गेली 53 वर्षे रखडलेल्या निळवंडे प्रकल्पातून दुसऱ्या चाचणीच्या निमित्ताने 14 ऑक्टोबर रोजी पाणी सोडले गेले होते. लाभक्षेत्रात यंदा पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याची परिस्थिती खुपच गंभीर आहे. अशातच अजूनही टेलच्या भागात वितरिकांचे काम बाकी आहे, त्यामुळे बंधारे व पाझर तलाव भरून द्यावे अशी टेलच्या शेतकऱ्यांची मागणी होती.
मात्र प्रस्थापीत राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष व प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे पाणी 1 महिना सुरु असूनही व्यवस्थित नियोजन न झाल्यामुळे पाणी शेवटच्या व गरज असलेल्या लाभक्षेत्रात पोहचले नाही. या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश होता.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


याचीच दखल घेत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा. सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी येथे बैठक घेतली होती तसेच चिंचोली गुरव येथे शेतकरी व जलसंपदा विभाग अधिकारी यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा घेत हा प्रश्न सोडवण्याचा शब्द दिला होता.दि. 13 नोव्हेंबर रोजी खा. सदाशिव लोखंडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेत, येथील परिस्थितीचे गांभीर्य सांगून पाणी वाढवून देण्याची मागणी केली. मा. मुख्यमंत्री यांनी याची तात्काळ दखल घेत संबंधित सचिव यांना त्वरित फोन द्वारे सुचना केल्या आहे. त्यामुळे पुढील काही दिवस निळवंडे धरणातून पाणी सुरूच राहून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा नक्कीच उपयोग होणार आहे.

kamlakar


गेली 5 दशके रखडलेला निळवंडे प्रकल्प खा. मा.सदाशिव लोखंडे साहेब यांनी मार्गी लावला. पाणी सुटल्यावर देखील आता अनेक प्रश्न निर्माण होत आहे पण ह्या प्रत्येक प्रश्नाला एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे खा. लोखंडे साहेब असा ठाम विश्वास आता लाभधारक शेतकऱ्यांमध्ये झाला आहे.


पाणी वाढवून दिल्याबद्दल तमाम लाभधारक शेतकऱ्यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब व खा. लोखंडे साहेब यांचे मनःपूर्वक धन्यवाद आहेत. असे अहमदनगर उत्तर शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते व निळवंडे पाट पाणी कृती समितीचे सचिव व शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल रावसाहेब घोरपडे यांनी सांगितले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button