Letest News
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप... राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप) सुनील निवृत्ती पाटील शिंदे यांचा प्रचंड दावा : “प्रभाग २ मध्ये नंदूभाऊंचा विजय ठरलेलाच… विरोधकांची ब... एआय बनावट वन्यप्राणी व्हिडिओवाल्यांना थेट जेल — एसपी सोमनाथ घार्गे यांची कडक सूचना”
अ.नगरक्राईम

अहिल्यानगरमध्ये असीम सरोदे यांचा आक्रोश — ‘खड्ड्यांनी जनता हैराण, मंत्री झोपा काढत आहेत का?’

अहिल्यानगर | सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत असीम सरोदे यांनी अहिल्यानगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, “रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, लोकांच्या हाडापर्यंत हादरे बसत आहेत. वयोवृद्ध, गर्भवती स्त्रिया, लहान मुलं — सर्वांची परिस्थिती दयनीय आहे. या रस्त्यांमुळे ड्रायव्हरपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वजण त्रस्त झाले आहेत.”

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

‘चांगले रस्ते हा जीवनावश्यक हक्काचा भाग’ — सरोदे यांचा न्यायालयीन दाखला

सरोदे म्हणाले की, “उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की, चांगले रस्ते असणे हा जीवनावश्यक हक्कांचा भाग आहे. पण तरीही सरकार आणि मंत्री याकडे दुर्लक्ष करत आहेत. हे मंत्री झोपा काढत आहेत का? नागरिकांचे प्रश्न तुम्हाला दिसत नाहीत का?”

‘खड्ड्यांसाठी बोला, हिंदू-मुस्लिम नाही!’ — सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा

सरोदे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर सुद्धा टीका करत म्हटले, “तुम्ही हिंदू-मुस्लिम भांडण लावत फिरता, पण खड्ड्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर येऊन आक्रोश करा. हेच लोकांचे खरे प्रश्न आहेत.”

‘फक्त सत्तेचे लोणचं — लोकांचे प्रश्न गौण’

“राधाकृष्ण विखे पाटील हे इतके अनुभवी मंत्री आहेत, तरी अहिल्यानगर रस्त्याचे अनेक वर्षांपासून प्रश्न सोडवले जात नाहीत. विधानपरिषदेचे अध्यक्ष राम शिंदे बसले आहेत, पण हे सगळे लोक सत्तेच्या खुर्चीत गुंग झाले आहेत. तुम्हाला फक्त पदं आणि सत्ता हवीय, पण लोकांचे दुःख दिसत नाही,” असा थेट सवाल असीम सरोदे यांनी केला.

‘तात्काळ रस्ते दुरुस्त करा — अन्यथा आंदोलन उभारणार’

सरोदे यांनी प्रशासनाला इशारा दिला की, “जर हे रस्ते तात्काळ दुरुस्त केले नाहीत, तर आम्ही मोठं जनआंदोलन उभारू. अहिल्यानगर हा पुरोगामी परिसर आहे, पण सध्या इथे फक्त खड्डेच दिसतात. सरकारने तातडीने पाऊल उचलले पाहिजे.”

‘मंत्री घरात बसलेत, लोक मरत आहेत!’ — तीव्र आरोप

अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करत सरोदे म्हणाले,
“इतके अनुभवी मंत्री असून तुम्ही घरात बसता का? लोकांचे प्रश्न न सोडवता कशाचे मंत्री आहात? इथे लोकांचे जीव जात आहेत आणि आपण गप्प बसता — हे योग्य नाही,” असा संतप्त सवाल त्यांनी केला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button