Letest News
वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी सुरक्षिततेची घ्यावी विशेष काळजी-शिर्डी पोलिसांचे आवाहन शिवसेना उद्धव गटाचे रावसाहेब खेवरे अखेर शिंदे शिवसेनेत दाखल उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभ... आधी ओळख मग मैत्री त्यानंतर योगेशचा त्या महिले सोबत ताथा थैया -हा गुन्हा खोटा की खरा चर्चांना उधाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर
अ.नगरराजकीय

अहिल्यानगरमध्येही ठाकरे गटाला खिंडार

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागली आहे. त्यामध्ये अहिल्यानगरचाही समावेश आहे. येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला आहे. उऱलेल्यांपैकी बहुतांश पदाधिकारी आता प्रवेश करणार आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

दोन दिवसांपूर्वी नगरमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी यासंदर्भात नगरमधील शिंदे सेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी चर्चा केली. त्यामध्ये ३० तारखेला प्रवेश करण्याचे ठरले. ठाकरे सेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, श्याम नळकांडे, सचिन शिंदे, संतोष गेनाप्पा, परेश लोखंडे, संग्राम कोतकर, बबलू शिंदे यांचा शिंदे सेनेत प्रवेश होणार असल्याचे समजल्यावर दानवे यांनी सोमवारी नगरला आले.

त्यांनी या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची हक्काची जागा राष्ट्रवादीला सोडल्याचा राग कार्यकर्त्यांना आहे, त्यामुळे पक्ष सोडण्यावर ते ठाम राहिले. नगर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, नगर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर हेही शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.अर्थातच यामागे येणाऱ्या स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकीचे गणित आहे.

विधानसभा निवडणुकीच्यावेळी ही जागा पूर्वीप्रमाणे शिवसेनेकडे घ्यावी, अशी पदाधिकाऱ्यांची मागणी होती. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. मात्र, वरिष्ठांनी ऐकले नाही. त्याचा रागही या पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात आहे. तेव्हा तुम्ही आमचे ऐकले नाही, आता तुमचे का ऐकावे, असे हे पदाधिकारी मध्यस्थी करण्यासाठी येणाऱ्यांना सांगत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button