Letest News
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप... राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप) सुनील निवृत्ती पाटील शिंदे यांचा प्रचंड दावा : “प्रभाग २ मध्ये नंदूभाऊंचा विजय ठरलेलाच… विरोधकांची ब... एआय बनावट वन्यप्राणी व्हिडिओवाल्यांना थेट जेल — एसपी सोमनाथ घार्गे यांची कडक सूचना”
राजकीयशिर्डी

शिर्डीकरांची मागणी — “विखे यांनी आदर्श उमेदवार द्यावेत!”🔸 “अनुभवी आणि लोकाभिमुख व्यक्तींनाच संधी”🔸 “शिक्षण चारित्र्य आणि गुन्हामुक्त पार्श्वभूमी गरजेची”

शिर्डी | आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीकर मतदारांमध्ये एक ठाम मत आकार घेत आहे — “आता केवळ ओळख नव्हे, तर पात्रता आणि प्रामाणिकपणावर उमेदवारी द्यावी!”

sai nirman
जाहिरात

गेल्या काही दिवसांत शहरातील विविध समाजघटक, व्यावसायिक व नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे की, विखे कुटुंबाने यावेळी सक्षम, सुशिक्षित आणि जनतेशी नाळ जोडलेले उमेदवारच मैदानात उतरवावेत.


🔸 “अनुभवी आणि लोकाभिमुख व्यक्तींनाच संधी”

DN SPORTS

नागरिकांचे मत आहे की, किमान पाच वर्षांचा सामाजिक किंवा सार्वजनिक अनुभव असलेल्यांनाच उमेदवारीची संधी दिली पाहिजे.
शिर्डी नगरपरिषदेसारख्या संवेदनशील व वाढत्या शहरात केवळ नावापुरते नव्हे, तर काम करणारे लोक गरजेचे आहेत, असे स्पष्टपणे सांगितले जात आहे.


🔸 “कुटुंबाचा सामाजिक सहभाग आवश्यक”

निवडणुकीच्या दृष्टीने नागरिकांचा आग्रह आहे की, ज्या घरातील उमेदवार देणार आहे, त्याचे कुटुंबही समाजात मिसळून राहणारे असावे.
लोकांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी उमेदवार आणि त्याचे कुटुंब समाजाच्या प्रत्येक घटकात आदराने राहणारे असावे, ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


🔸 “शिक्षण, चारित्र्य आणि गुन्हामुक्त पार्श्वभूमी गरजेची”

शिर्डीकरांनी स्पष्ट सांगितले —
“उमेदवार हा गुन्हा दाखल नसलेला, प्रवृत्तीने प्रामाणिक आणि सुशिक्षित असावा.
किमान शिक्षण असलेला व कुटुंब सुशिक्षित असलेले लोक शहराचा चेहरा बदलू शकतात.”
शिक्षण आणि चारित्र्य हे उमेदवारीचे निकष व्हावेत, अशी मागणी होत आहे.

kamlakar

🔸 “सर्व समाजघटकांना सोबत घेणारे नेतृत्व हवे”

शिर्डी हे विविध जाती-धर्मांच्या लोकांचे एकत्र नांदणारे शहर आहे.
म्हणून नागरिकांच्या अपेक्षा आहेत की, उमेदवार सर्व समाजघटकांना समान वागणूक देणारा, विरोधकांनाही सोबत घेऊन चालणारा आणि वार्डातील तसेच शहरातील सर्व समस्यांची जाण असणारा असावा.


🔹 शिर्डीकरांचा ठाम संदेश

“विखे कुटुंबाने या वेळेस आदर्श, लोकाभिमुख आणि प्रामाणिक उमेदवारच द्यावेत.
शिर्डीला विकासाच्या नव्या वाटेवर नेणारे, सर्वांना जोडणारे नेतृत्व आम्हाला हवे आहे.”

🗣️ जनतेचा स्पष्ट सूर —

“नेतृत्व बदललं तरी कार्यसंस्कृती बदलली पाहिजे!” 🙏

दैनिक साईदर्शनाच्या सर्वे नुसार पुढील नगराध्यक्षा हे शेजवळ कुटुंबियांतूनच होईल परंतु ते शेजवळ कोण?
आपलें काय मत आहे ते अवश्य कळवावे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button