Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
अ.नगरक्राईम

पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 9 कोटी बोगस कर्जमाफी प्रकरणी संचालकानविरोधात गुन्हा दाखल करा सर्वोच्च न्यायलय

भाजप नेते व राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पद्मश्री विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नऊ कोटी बोगस कर्जमाफीप्रकरणी संचालकांविरोधात गुन्हा दाखल करून तपास करा, असे महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यासंदर्भातील माहिती बाळासाहेच केरुनाथ विखे, दादासाहेब पवार, अरुण कडू, एकनाथ घोगरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

विखे कारखान्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणासंदर्भात अरुण कडू यांनी तक्रार दाखल करून लक्ष वेधले होते. कारखान्यामध्ये झालेल्या बोगस कर्ज प्रकरणाचा त्यांनी पाठपुरावा येथील जिल्हा उपनिबंधक व न्यायालयामध्ये केला. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सत्तेचा कशा पद्धतीने गैरवापर केला, याचे त्यांनी पुरावेही न्यायालयात सादर केले होते.

kamlakar

बाळासाहेब केरुनाथ विखे अरुण कडू म्हणाले, ‘राहाता येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकायांनी कारखान्याच्या संचालक मंडळाविरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचा जो आदेश दिला होता, तो उच्च न्यायालयाचे संभाजीनगर खंडपीठाने रद्द ठरविला होता. खंडपीठाच्या आदेशाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली व राहाता न्यायालयाचा आदेश कायम ठेवण्याची विनंती केली होती. सर्वोच्य न्यायालयाने राहाता न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून विखे कारखाना संचालकांविरोधात कलम १५६ (३) अन्वये गुन्हे दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्याचे मंत्री राधायुष्ण विखे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या विखे साखर कारखान्याने सन २००४-०५मध्ये युनियन बैंक व बैंक ऑफ इंडिया या दोन राष्ट्रीयीकृत बँकांकडून सुमारे नऊ कोटी रुपयांचे कर्ज ऊस लागवड बेसल डोसकामी घेतले होते. सभासदांसाठी आलेले हे कर्ज देताना बँकांनी ज्या अटी घातल्या होत्या, त्यात प्रामुख्याने ही रक्कम शेतकत्यांना धनादेशाद्वारे द्यावी किंवा त्यांच्या खात्यात सरळ भरणा केला जावा,

असे म्हटले होते. मात्र, या रकमेचे वाटप सभासद शेतकऱ्यांना कबीच केले गेले नाही. या रकमेचा वापर कारखान्याने मर्जीप्रमाणे केला व त्याची माहितीसुद्धा शेतकयांसह कोणालाही दिली नाही

सर्वोच्य न्यायालयाने पोलीस तपासात आव्हान देण्याची मुभा दिल्यामुळे याचिकाकत्यांनी राहाता येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर दावा दाखल केला. राहाता न्यायालयाने पोलिसांना एफआयआर नोंदविण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाविरोधात विखे कारखान्याने उम्य न्यायालयात अव्हान दिले. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने राहाता याचिकाकत्यांनी सर्वोच्य न्यायालयात धाव घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचा निर्णय रद्द केल्य आणि पोलिसांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राहाता यांच्या आदेशानु‌सार कार्यवाही करून आठ आठवडयांत तपास पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्ते दादासाहेव पवार यांच्या वतीने अॅड. प्रज्ञा तळेकर, अॅड. पुलकित अग्रवाल यांनी काम पाहिले. तसेच याचिकाकर्ते, कारखान्याचे सभासद बाळासाहेच केरुनाथ विखे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ सुर्धाशु चौधरी यांनी काम पाहिले, विखे कारखान्याकडून ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली.

राज्य शासनाने कृषी कर्जमाफी योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या प्रस्तावाचे लेखापरीक्षण करताना बँकेने ज्यांना कर्जवाटप केल्याचे दाखविले होते, त्या प्रत्येक शेतकऱ्याची बैंक स्टेटमेंटसह माहिती मागितली. ही माहिती बँकेकडे, तसेच कारखान्याकडे उपलब्ध नसल्याने विभागीय निबंधक सहसंस्था लेखापरीक्षण नाशिक यांच्या निदर्शनास आले. बँकांनी सादर केलेला प्रस्ताव सन २००९च्या कृषी

कर्जमाफी योजनेच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे सन २०१२पासून राज्य शासनाने कृषी कर्जमाफी योजनेअंतर्गत माफ केलेल्या नऊ कोटींची संपूर्ण रक्कम ६ टक्के व्याजासह देण्यास सांगितले, कारखाना व बँकेने मधल्या काळात रक्कम वापरली होती. त्या रकमेची परतफेड केली; परंतु शासनाने ६ टक्के व्याज कारखाना किवा बँकांनी दिलेच नाही. दरम्यान, याचिकाकत्यांनी फसवणूक

खोटे कागदपत्रे तयार करणे व त्याद्वारे शेतकयांच्या नावाच्चा गैरवापर करून रकमेथा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यासाठी तक्रार केली. मात्र, २३ नोव्हेंबर २०१५ रोजी सहकार राज्यमंत्र्यांनी याबाबत निर्देश दिले. यामध्ये ज्या संस्था किंवा बँकांनी अनियमित कर्जमाफीच्या प्रस्तावातून मिळालेल्या रकमेची परतफेड केली आहे, अशा संस्था किंवा बँकांवर फौजदारी कारवाई केली जाणार नाही, असे म्हटले होते. या निर्णयाचा आधार घेऊन पोलीस अधिकत्वाने याचिकाकर्ते विखे व पवार यांच्या तक्रारीमध्ये काहीही हस्तक्षेप केला नाही.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button