Letest News
पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ... शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन जिल्हा कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात उत्साहाचा नवा संचार
अ.नगरराजकीय

तालुका पातळीवर कृषी प्रदर्शन भरविण्याची गरज – कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शिर्डी, (प्रतिनिधी) शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी स्थानिक युवकांनी एकत्र येत तालुका पातळीवर कृषी प्रदर्शन भरविण्याची गरज आहे, अशा प्रदर्शनांना शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.अकोले येथे आयोजित कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव शिंदे, द्राक्ष बागायतदार संघटनेचे कैलासराव भोसले, आबासाहेब थोरात, कपिल पवार, पाणी फाऊंडेशनचे अविनाश पोळ, कळस कृषी प्रदर्शन समितीचे सागर वाकचौरे, संदीप वाकचौरे, नामदेव मिसाळ आदी उपस्थित होते.


कृषीमंत्री श्री.कोकाटे म्हणाले, आतापर्यंत कृषी अवजारांची प्रदर्शने पाहिली आहेत. आज प्रथमच प्रत्यक्ष पीकांच्या शेतीसह असलेले प्रदर्शन पहात आहे. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून तरूणांना शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याचे ज्ञान प्राप्त होते. आज महाराष्ट्रात एका पीकांचे वेगवेगळे २०० प्रकारांच्या वाणांचे संशोधन झाले आहे. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाला पाहिजे यावर शासनाचा भर आहे. योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आली पाहिजे यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.


तरूणांना शेती क्षेत्राकडे वळविण्यासाठी कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक खत व बियाणे न वापरता, प्रमाणित केलेली खते व बियाणे अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी केली पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.
शेतकऱ्यांनी नकारात्मक होऊन खचून जाऊ नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


कार्यक्रमानंतर ,कृषीमंत्र्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट देत पिकांच्या नवनवीन वाणांची माहिती जाणून घेतली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button