Letest News
शिर्डीत भक्तिरसाचा महापर्व! साई–हरी नामाचा सार्वजनिक कीर्तन सोहळा ५०व्या वर्षात — शिर्डी पंढरपूरमय मतदानाच्या दिवशी शिर्डी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय-मतदान प्रक्रियेला अडथळे टाळण्यासाठी प्रशासन... प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पस... अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप...
अ.नगरक्राईम

बीड जिल्ह्याप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातही अवैध धंद्यामुळे वाढली गुन्हेगारी!

शिर्डी ( प्रतिनिधी) बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांप्रमाणेच अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांनी कडक निर्णय घेणे महत्त्वाचे असून अवैध धंद्यांच्या विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक कधी ॲक्शन मोडवर येणार? असा सवाल जिल्ह्यातील नागरिकांकडून आता होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वाल्मिक कराड याला ताब्यात घेतल्यावर त्याच्या समर्थकांनी आंदोलने केली आहेत. बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून जातीय तेढ वाढल्याचं दिसून आलं आहे. मराठा आणि वंजारी समाज यांच्यात आरक्षणावरून आधीच काही संघर्ष असताना संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे प्रकरण आणखी तापताना दिसत आहे.

अशातच जातीय तेढ वाढू नये यासाठी बीडचे एसपी नवनीत काँवत यांनी कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देत एकप्रकारे इशाराही दिला आहे.पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकारी यांना शिस्त लावण्यासाठी, त्याचबरोबर जातीयवाद नसावा यासाठी, आता प्रयत्न सुरू केले आहेत.

यापुढे अधिकाऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना हाक मारताना, त्यांच्या आडनावाऐवजी थेट नावाने हाक मारावी. वर्दीवर असताना रील्स काढून सोशल मीडियावर टाकल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे, त्याचबरोबर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप झाला तर ठाणेप्रमुखाची थेट नियंत्रण कक्षात बदली केली जाईल.

अशा सूचना देत थेट इशारा देखील, यावेळी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला आहे. त्याप्रमाणेच अहिल्या नगर जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही असे काही धाडसी निर्णय घेतले पाहिजेत. सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंदे तेजीत सुरू आहेत. व त्यातूनच गुन्हेगारी वाढत जाते. बीड जिल्ह्याचे वातावरण व तेथील परिस्थिती लक्षात घेता अहिल्यानगर जिल्ह्यातही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कडक धोरण स्वीकारले पाहिजे.

बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कधी ॲक्शन मोडवर येणार असा सवाल आता जिल्ह्यातील नागरिक करत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध दारू धंदे मटका जुगार अवैध वेश्या व्यवसाय अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या अवैध धंद्यातून मिळालेल्या पैशावर दादागिरी गुंडगिरी मोठ्या प्रमाणात चालते. त्यामुळे जिल्ह्यातील हे अवैध धंदे कधी बंद होणार जिल्हा पोलीस अधीक्षक कधी ॲक्शन मोडवर येणार असा सवाल जिल्ह्यातील नागरिक करत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button