Letest News
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे... शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांची बदली त्याच्या जागी अमोल भारती यांची वर्णी साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीन... शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुध्द मकोका कायदयान्वये कारवाई नगर मनमाड रोडवरील हॉटेल मध्ये खंडणीसाठी गुंड्यांचा हैदोस  शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करा... तत्कालीन अकार्यक्षम पोलीस निरीक्षक दिनेश आहेरचा कारनामा सहा जिवंत काडतूस जमा करून एक काडतूस केला गाय... स्थानिक निवडणुकी साठी शिवसैनिकाणी सज्ज रहा अपहरणं करून डोक्याला बंदूक लावत पन्नास लाखाच्या चेकवर सही करून घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश हिरे सुवर्णविजेते पदकचे माणकारी
Blog

जरांगे यांचा कंठ दाटला, डोळे पाणावले

मराठा आरक्षणासाठी 26 जानेवारीला आंदोलन करण्यासाठी मराठा समर्थक घेऊन मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीमधून निघाले आहेत. मुंबईतील मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात करणार असलेल्या जरांगेंनी शेवटची खेळी करत आंतरवालीमधूनच उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने बघ्याची भूमिका घेतल्यामुळे मुंबईत यावं लागत आहे, अशी टीकाही मनोज जरांगे यांनी केली. आंतरवाली सराटीमधून निघण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी सरकारवर हल्ला करताना त्यांचे डोळे पाणावले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


आंतरवाली सराटीमधील पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाले. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘तुम्ही आरक्षण दिलं असतं तर मुंबईला जाण्याची गरज भासली नसती. मी समाजात असो अथवा नसो माझ्या छातीत गोळ्या जरी घातल्या तरी आता घेणार नाही. मी तुमच्यात असो-नसो आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेवू नका. अशी भावनिक साद ही त्यांनी समाजाला घातली. आतापर्यंत काय-काय घडलं आहे हे सगळ्यांना माहीत असून मुंबईच्या आंदोलनात एकत्र ताकद दाखवा असं आवाहनही त्यांनी केलं. मी असेल नसेल एकजूट फुटू देऊ नका आणि एकी तशीच ठेवा, असंही ते यावेळी म्हणाले. ‘आम्ही आमचेही टप्पे पाडलेले असून माझ्या सोबत किती लोक दिसतील माहीत नाही. पण मुंबई जवळ गेल्यावर हा आकडा कोट्यावधी आंदोलकांचा होणार असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. ही आता शेवटची लढाई आहे कुणीही घरी थांबू नका, असं आवाहन त्यांनी समाजाला केलं आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button