Letest News
अबब! साई संस्थान हादरले — संस्थानमधील ४७ कर्मचाऱ्यांनी साईबाबांच्या झोडीत हात घातला”“शेवटी साईबाबांच... पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ...
Blog

जरांगे यांचा कंठ दाटला, डोळे पाणावले

मराठा आरक्षणासाठी 26 जानेवारीला आंदोलन करण्यासाठी मराठा समर्थक घेऊन मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीमधून निघाले आहेत. मुंबईतील मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात करणार असलेल्या जरांगेंनी शेवटची खेळी करत आंतरवालीमधूनच उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने बघ्याची भूमिका घेतल्यामुळे मुंबईत यावं लागत आहे, अशी टीकाही मनोज जरांगे यांनी केली. आंतरवाली सराटीमधून निघण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी सरकारवर हल्ला करताना त्यांचे डोळे पाणावले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


आंतरवाली सराटीमधील पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाले. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘तुम्ही आरक्षण दिलं असतं तर मुंबईला जाण्याची गरज भासली नसती. मी समाजात असो अथवा नसो माझ्या छातीत गोळ्या जरी घातल्या तरी आता घेणार नाही. मी तुमच्यात असो-नसो आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेवू नका. अशी भावनिक साद ही त्यांनी समाजाला घातली. आतापर्यंत काय-काय घडलं आहे हे सगळ्यांना माहीत असून मुंबईच्या आंदोलनात एकत्र ताकद दाखवा असं आवाहनही त्यांनी केलं. मी असेल नसेल एकजूट फुटू देऊ नका आणि एकी तशीच ठेवा, असंही ते यावेळी म्हणाले. ‘आम्ही आमचेही टप्पे पाडलेले असून माझ्या सोबत किती लोक दिसतील माहीत नाही. पण मुंबई जवळ गेल्यावर हा आकडा कोट्यावधी आंदोलकांचा होणार असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. ही आता शेवटची लढाई आहे कुणीही घरी थांबू नका, असं आवाहन त्यांनी समाजाला केलं आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button