Letest News
साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
राजकीयशिर्डी

गोरगरीब जनतेच्या हितासाठी निर्णय घेणार असाल तर सुजय विखेंचा पेढेतूला करणार सुरेश आरणे

शिर्डी प्रतिनिधी
शिर्डीच्या साई मंदिरात कोविड काळात भाविकांना हारप्रसाद, फुले नेण्यास बंदी करण्यात आली होती ती बन्दि आजपर्यंत सुरु आहे. त्यामुळे भाविकांना फक्त दर्शनावर समाधान मानावे लागत होते परंतु साई समाधी व बाबांच्या चरणी फुले किंव्हा हार अर्पण करण्याची अनेक भाविकांची इच्छा असते मात्र प्रशासनाच्या निर्णयामुळे त्यांना नाराजीचा सामना करावा लागत होता. याविषयी शिर्डीतील काही तरुणांनी आंदोलन केले होते तर शिर्डीतील दिगंबर कोते यांनी सात दिवस उपोषण सुद्धा केले होते, परिणामी एक दिवस काही तरुणांनी आंदोलन करत मंदिरात फुले नेण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या बद्दल गुन्हा देखील दाखल झाला होता.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


हार प्रसादाच्या नावाखाली भाविकांची लूट होते व त्यामुळे शिर्डीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे असा समज ग्रामस्थ्यांचा झाला होता व यावर तोडगा काढण्यासाठी ना. विखे यांच्या बरोबर सर्वपक्षीय ग्रामस्थ्यांची चर्चा झाली मात्र त्यातून मार्ग निघाला नाही व सदर प्रश्न न्यायालयात गेला.परिणामी शिर्डी आणि परिसरातील अडीचशे एकर फुलशेती आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते तसेच यामध्यमातून हातावर फुलांचे गुच्छ व हार प्रसाद विकणाऱ्या व्यावसायीकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे ही बाब जेंव्हा सुजय विखे यांच्या लक्षात आली

तेंव्हा त्यांनी स्वतःच्या खर्चाने मा. उच्च न्यायालय औरंगाबाद येथे केस दाखल केली या प्रकरणाची न्यायालयाने दखल घेत भाविकांना मंदिरात हार फुले वाहण्यासाठी संमती दर्शविली होती व त्या अनुषंगाने यावर साई संस्थांनला आपले म्हणणे सादर करण्यास दोन आठवड्याची मुदत दिली होती, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साई संस्थांनने आपले म्हणणे सादर केले असून त्यांनीही भाविकांच्या श्रद्धेचा विचार करत मंदिरात हार, फुले वाहन्यास संमती दर्शविली आहे. एकंदरतीच 12 जुलै रोजी यावर मा. उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय होण्याची शक्यता असून फुलशेती करणारे शेतकरी, हारप्रसाद, फुले विकणारे व्यावसायिक यांच्यासाठी येणारा निर्णय दिलासदायक व आनंदाचा ठरणार आहे.


या सर्व प्रक्रियेमध्ये सुजय विखे यांचे मोलाचे योगदान असून 12 जुलैच्या निकालानंतर शिर्डीतील हारप्रसाद, फुले विकणाऱ्या तरुणांचे नेतृत्व करणारे मा. नगरसेवक सुरेश आरने हे डॉ. सुजय विखे यांची पेढेतूला करणार असल्याच जाहीर केलं आहे. तर अनेकांनी त्यांची मिरवणूक काढण्याची तयारी व नियोजन केलं आहे.
राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमच्या गोरगरीब जनतेच्या हितासाठी जो नेता निर्णय घेत असेल तर त्यांचा सन्मान करण आमचा धर्म समजतो म्हणून आम्ही सुजय विखे यांचा जंगी सत्कार व पेढेतूलाचा कार्यक्रम करणार आहोत. सुरेश आरणे , मा. नगरसेवक शिर्डी.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button