Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
Blog

मसाला पान खाणार असाल तर सावधान शहरात पान व्यवसाईकांची व्यसन लावण्या साठी मसाला पानातून केली जाते फसवणूक

श्रीरामपूर( प्रतिनिधी)
सध्या श्रीरामपूर शहरासह तालुकाभरातील विविध पान टपऱ्यांमधून स्ट्रॉंग तंबाखू असलेले किवामयुक्त फुलचंद पान आजही उपलब्ध होत असल्याने राज्य सरकारने सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखूवर घातलेली बंदी केवळ कागदावरचा फार्स ठरली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


स्ट्रॉंग तंबाखूजन्य फुलचंद पान हे असे पान आहे. जे नजर चुकीने जरी एखाद्या इसमाने मसाला पान म्हणून खाल्ले तर खाणाऱ्यास भयंकर चक्कच येणे, त्याच्या ह्रदयाचे ठोके वाढणे,मळमळ होणे अस्वस्थ वाटणे, हातपाय गळण्यासारखे वाटणे असे भयंकर लक्षण दिसून येतात.
एखाद्याचे ॲजिओप्लास्टी किंवा बायपास झालेले असल्यास सदरील पान हे त्याच्या जीवावर बेतू शकते. असे हे स्ट्रॉंग तंबाखूजन्य पान आहे. म्हणून असे पान विकणाऱ्या पान टपऱ्याधारकांवर वेळीच योग्य कारवाई झाली पाहिजे. असे आसलम बिनसाद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

kamlakar


या पत्रकात पुढे म्हटले आहे की, श्रीरामपुर शहरामध्ये किमामचा स्वाद असलेली पाने केव्हाही मिळत आहेत. एवढेच नव्हेतर, गुटखाबंदी असतानाही काही ठराविक ग्राहकांना महागडय़ा दरात गुटखा सहजासहजी मिळत असल्याने सरकारच्या गुटखाबंदीचा सर्रास फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.
सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखू यावर महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून बंदी घातलेली आहे,ती बंदी उठवण्यायाबाबत अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. मात्र ही बंदी लागू असतानाही स्ट्रॉंग तंबाखूजन्य किमामयुक्त पान आजही ग्राहकांना सहजपणे उपलब्ध होत आहे.


एके काळी लोकप्रिय असलेल्या मसाला पानाची जागा फुलचंद या पानाने घेतली असल्याने,तोंडाला सुगंध आणणारा किमांम आणि चटणी हे मुख्य घटक या पानाची वैशिष्ट्ये वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे,
आणि तरुण वर्ग एकप्रकारे अशा वेसनाच्या आहारी जात असुन अन्नभेसळ प्रतिबंधक विभाग,गुन्हे अन्वेषण आणि संबंधित स्थानिक पोलिस प्रशासन याबाबत संबंधित तंबाखूजन्य किमांम वापरणाऱ्या पानटपऱ्या धारकांवर कोणतीही उचित कार्यवाही न करता केवळ बघ्याची भुमिका बजावत असल्याने त्यांच्याही कर्तबगारीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.


बंदी असलेले हे पदार्थ व आरोग्यास घातक असणारा हा माल राजरोसपणे विक्री करणारे संबंधित पानटपऱ्यां,व पान टपरीधारक, व्यावसायिक आणि ज्यावर ज्यांचे नियंत्रण असावे असे संबंधित खात्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्यात आपसात संगनमत तर नाहीना?अशी शंका त्यामुळे व्यक्त होत असून जर दिवसाढवळ्या इतक्या प्रचंड प्रमाणात बंदी असलेले गुटखा, मसाला सुगंधी पानच्या नावाखाली स्ट्रॉंग तंबाखूजन्य फुलचंद पानाची राजरोसपणे विक्री होत असेल, शिवाय बंदी असलेला सर्व प्रकारचा गुटखा हा राजरोसपणे विकला जात असेल तर मग यावर आवर घालणारे संबंधित प्रशासन काय करत आहे ? असा खडा प्रश्न आज शहरासह तालुक्यातील नागरीकांच्या मनात निर्माण होतो आहे.

संबंधित खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सदरील पान टपऱ्याधारकांशी जर
लागेबांधे नसेल तर मग कारवाई का केली जात नाही ?अशीही शंका उपस्थित केली जात आहे.
मात्र बातम्या आणि निवेदन देवून कोणास काहीच फरक पडणार नाही,सर्वच गेंड्याच्या कातडीचे बनले आहे,मात्र त्यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे .याकरीता पत्रकार आसलम बिनसाद आणि तमाम सामाजिक कार्यकर्ते याविरुद्ध उग्र आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग स्विकारणार आहेत.तरच असले गैरप्रकार बंद होतील .अन्यथा ये रे माझ्या मागल्या प्रमाणे होईल.जसे मागे चालु राहीले तसे पुढे देखील चालुच राहणार असून या करीता सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील वेळीच सावध होऊन या गैरप्रकाराला वाचा फोडणेकामी पुढे आले पाहिजे .तरच सर्व काही शक्य होवू शकणार आहे.
असे ज्येष्ठ पत्रकार तिरंगा न्यूजचे संपादक आसलम बिनसाद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button