Letest News
‘विखेंनी साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगावे!’ – नगर–मनमाड रस्त्यावर निलेश लंके यांचा थेट हल्ला साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या भाविकांवर डल्ला! शिर्डीत चैनस्नॅचिंग करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद-स्थ... १५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्...
राजकीयशिर्डी

माझी आजही कुस्ती खेडायची तय्यारी आहे जनतेने दिलेला कौल मान्य करून मतदारांचे आभार माजी खासदार सदाशिव

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत झालेल्या पराभवा नंतर माजी खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी शिर्डी येथे पार पडलेल्या हॉटेल शांती कमल येथील बैठकीत कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे व या निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून आभार मानले

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

यावेळी बोलताना माजी खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की निवडणुकीत जय पराजय ठरलेला असतो आपण अनेकदा आमदारकी व खासदारकीचा विजय बघीतला आहे कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून न जाता या पुढील काळात देखील शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेला न्याय देण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहण्याचा संकल्प देखील जाहीर केला खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे विजयी झाले आहेत त्यांना भविष्यातील कामासाठी आमच्या नेहमीच शुभेच्छा राहतील त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील असलेले विविध प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली लोखंडे म्हणाले की

kamlakar


आपण या पराभवांना जराही खचलेलो नाही कालही जनतेचे काम प्रामाणिक केले आणि ह्यापुढेही प्रामाणिकपणे जनतेचे काम करत राहाणार आहोत मी पडल्याचा दुःख नसून देशात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होत आहेत याचाच आम्हाला आनंद आहे जनतेने मला भरभरून प्रेम व आशीर्वाद दिला आहे

मी पदावर असलो कि नसलो तरी जनतेची सेवा करत राहाणार आहे या निवडणुकीत कोणतीही राजकारण झालं नसून महायुतीच्या सर्व नेत्यांनी मनापासून काम केलं आहे तर पराभव आणि विजय ही मी अनेकदा अनुभवला असून त्यामुळे कार्यकर्त्यांनी ह्या पुढील काळात एक संघ एक विचाराने विविध प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन आपण काम करत राहणार असल्याचे सांगितले

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button